शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

गोदावरी नदीपात्राला पानवेलींचा पुन्हा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:03 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासन उदासीन : परिसरात दुर्गंधीसह जलचरांचे अस्तित्व धोक्यात

चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.तीन ते चार वर्षांपासून नांदूरमध्येश्वर ते माडसांगवी या सुमारे ३० किलोमीटरपर्यंतच्या गोदावरी नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. या पानवेली नवीन चांदोरी-सायखेडा पुलाजवळ अडकून राहतात.त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याचा प्रवाह संथ झाल्याने पानवेली एकाच ठिकाणी अडकून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यामुळे प्रशासनाने त्या पानवेली मोकळ्या करून पुढे काढून देण्याचे काम केले; मात्र पुढे जाऊन त्या चांदोरी-सायखेडा या जुन्या पुलाला अडकल्या आहेत. या पानवेली नांदूरमध्येश्वर धरणात अडकण्याची शक्यता आहे. सदर पानवेलींची समस्या सोडविण्याची मागणी नागरिक व पर्यटकांकडून केली जात आहेत.चांदोरी येथील गोदावरी पात्रातील पानवेलींची समस्या गंभीर असून, यासाठी पानवेली काढण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे.- वैशाली चारोस्कर, सरपंच, चांदोरीपानवेलीच्या समस्येमुळे नदीमधील जलचरांना धोका पोहचत असून, पाणी दूषित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन गोदावरी नदीचे पात्र पानवेलीमुक्त करावे.- सागर गडाख, नागरिक

टॅग्स :nifadनिफाडgodavariगोदावरी