शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पांगरी : दूध दरवाढ व पूर्व भागात पाण्याचे टॅँकर सुरू करण्याची मागणी छावा संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:11 IST

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टॅँकर सुरू करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाशेतकºयांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टॅँकर सुरू करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे पाऊण तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टॅँकरचे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल व दूध दरवाढीबाबत वरिष्ठांकडे भावना पोहचविल्या जातील, असे आश्वासन तहसीलदार नितीन गवळी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला होता. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर छावा संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकरी व महिला रस्त्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. हंडे घेऊन महिला रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दूध दरवाढ झालीच पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनानंतर तहसीलदार नितीन गवळी पांगरी येथे दाखल झाले त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे आनंद रासणे, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी, ग्रामविकास अधिकारी पी. आर. बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब बैरागी, रामजी पगार, संपत पगार स्वाभिमानी संघटनेचे आत्माराम पगार, शांताराम पगार, संजय वारूळे, बारकू पगार, आर, टी, जाधव, छावा संघटनेचे राशिद सय्यद, अखिलेश राजपूत, अरुण निकम, प्रकाश पांगारकर, निखिल पांगारकर, रमेश पांगारकर, सुनील कलकत्ते, समाधान पांगारकर, लताबाई पगार, सुलोचना निकम यांच्यासह ग्रामस्थ, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत पगार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकार शेतकऱ्याविरुद्ध असून, आतापर्यंत शेतकºयांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नसल्याचा आरोप केला. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असल्याचे ते म्हणाले. दूध खरेदी व दूध पिशवी विक्रीमध्ये असणारी तफावत दूर करत स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर सुभाष पगार, शत्रुघ्न झोंबड, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांनी मनोगत व्यक्त केले.