शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

सरपंच आरक्षण सोडत लांबल्यामुळे पॅनलप्रमुखांची हवा गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:09 IST

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत रणधुमाळी : निवडणूक खर्चासाठी आखडता हात

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वी होणार असे जाहीर झाले होते. त्यामुळे पॅनलप्रमुख व इच्छुक निर्धास्त होते. आपण किंवा आपल्याच गटातील उमेदवार सरपंच होणार या आविर्भावात अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. गावाचा कारभार आपल्या हाती येणार म्हणून काहींनी पैशांची जुळवाजुळवदेखील केली होती. आपल्या पॅनलमध्ये कोणते उमेदवार असावेत, कोण सरपंच व उपसरपंच असावा याचीही निश्चिती करून ठेवली होती. कोणत्या वॉर्डात कोण निवडून येणार, उमेदवारांची मते किती, किती मते बाहेर गेलेली, वॉर्डात किती मते आपली, किती मते विरोधकांना पडतील, विरोधकांचा प्रभाव किती, या सर्व गोष्टींचा अभ्यास पॅनलप्रमुखांनी दोन महिन्यांपासून केला होता. मात्र, सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याचे जाहीर केल्याने पॅनलप्रमुख थंडगार पडले आहेत.आता निवडणूक लढताना खर्च कोणी करायचा, हा मोठा प्रश्न उमेदवारापुढे उभा राहिला आहे. आरक्षणामुळे पॅनलप्रमुख द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे पॅनल करतानाही अनेकजण आता डळमळीत होताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेले अनेक कार्यकर्ते सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिरमुसले असून, पुन्हा तेच आरक्षण निघते की नव्याने दुसरे आरक्षण काढण्यात येते, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधितांकडून खर्चाबाबत आखडता हात घेतला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.गावगाड्यातील गप्पा रंगल्या सोशल मीडियावरग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गाव विकासाचा गंध नसणारेही सध्या विकासाच्या गप्पा मारताना दिसत आहेत. अनेक युवक सोशल मीडियावर टीका-टिप्पणी करीत आहेत. अशा लोकांना जनता किती थारा देईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत