शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांपासून ‘ते’ करतात पंढरपूरची पायी वारी

By admin | Updated: July 8, 2016 23:17 IST

नऊ वर्षांपासून ‘ते’ करतात पंढरपूरची पायी वारी

 बेलगाव कुऱ्हे : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेली असते. ती पूर्ण करण्यासाठी खडतर मार्गांचा सामना करीत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील एका शेतकरी कुटुंबातील उत्तमराव झनकर व त्यांच्या पत्नी रंजना झनकर हे दांपत्य नऊ वर्षांपासून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पायी दिंडीत विठ्ठल नामाच्या जयघोष करत खडतर पायी वारी पूर्ण करीत मोठा आदर्श निर्माण करीत आहेत.झनकर यांची लहानपणापासूनच पांडुरंगांवर श्रद्धा आहे. रोज न चुकता ते सकाळ- संध्याकाळ गावातील मंदिरात विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. याशिवाय घरी संध्याकाळचा हरिपाठ वीस वर्षांपासून नित्यनेमाने अखंडित चालूच आहे.त्र्यंबकेश्वर व पंढरपूरची महिन्याची वारीदेखील ते आजपर्यंत न चुकता करीत आहेत.अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाचे झनकर हे कुठलीही अपेक्षा न करता अंत:करणापासून विठ्ठलाची भक्ती करत आहेत. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरच्या पायी दिंडीत ते दरवर्षी सहभागी होतात.दुर्दम्य इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर नऊ वर्षांपासून पायी दिंडीत प्रवास पूर्ण करीत ते ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संतवचनाच्या उक्तीनुसार पंढरपूर परिसरात वृक्षलागवडदेखील करत आहेत. जन्मा येणे देवा हाती, करणी जग हसवी या न्यायाने आपला जन्म कोणत्या जातीत, धर्मात, देशात व कोणत्या काळात कसा होईल, हे आपल्या हाती नसते; परंतु कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्यांनी वारकरी संप्रदायाचे व्रत अखंड सुरू ठेवले आहे. थोरांचा आदर, गुरूजनांचे ऋण, आई-वडिलांचे पूजन, दर्शन, गायन, पखवाजवादन, भजन, कीर्तन करीत टाळ-मृदंगाच्या गजरात ते पारमार्थिक कार्य करीत आहेत. क्षणाक्षणाला पांडुरंगाच्या भेटीसाठी जगण्याचा आनंद कोणत्याही कार्याला आभाळाची उंची व सागराची खोली मिळवून देऊ शकतो, हेच उत्तमराव झनकर व त्यांच्या पत्नीने जगाला दाखवून दिले आहे.(वार्ताहर)