शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

पांडेंचे बंड झाले थंड!

By admin | Updated: February 5, 2017 00:40 IST

राड्याबद्दल उद्धव नाराज : गैरसमजुतीतून वाद झाल्याचा दावा

नाशिक : कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण केली. त्यानंतर पांडे यांनी जिल्हा प्रमुख आणि महानगरप्रमुखांना हटविण्याची तयारी केली, परंतु शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होताच पांडे यांचे बंड थंड झाले आहे. इतकेच नव्हे तर शुक्रवारी झालेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे त्यांनी आता म्हटले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर विनायक पांडे यांना प्रभाग तेरामधून तर प्रभाग २४ मधून त्यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, तसेच भावजय विद्यमान महिला नगरसेवक कल्पना पांडे अशा तिघांना उमेदवारी पाहिजे होती. पैकी ऋतुराज पांडे आणि कल्पना पांडे यांना उमेदवारी मिळत नसल्याचे दिसताच वादाला सुरुवात झाली. महानगर प्रमुख अजय बोरस्ते तसेच जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी अन्य इच्छुकांकडून लाखो रुपये घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप केला. त्यानंतर बोरस्ते आणि करंजकर यांच्यावर पांडे समर्थकांनी हल्ला करून मारहाण केली होती. बोरस्ते समर्थकांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी पांडे यांना तातडीने मुंबईला पाचारण केले होते. त्यानुसार शनिवारी पांडे यांनी ऋतुराज पांडे तसेच समर्थक कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पांडे यांनी बोरस्ते-करंजकर हटावची भूमिका मागे घेतली आणि उलटपक्षी शुक्रवारी झालेले वाद हे गैरसमजुतीतून झाल्याचा दावा केला. आपण स्वत: कोणत्याही प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तसेच आपल्या मुलाला उमेदवारी न मिळाल्याने त्यानेही अर्ज दाखल केला नसल्याचे स्पष्ट केले. आता पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगतानाच बंड थंड केल्याचे स्पष्ट केले. यावेळी पांडे यांच्यासमवेत सचिन बांडे, सचिन भालेकर, संतोष कानडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)