त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पंचायतराज समितीचे आगमन होणार असल्याने पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून, समिती पदाधिकारी कोणकोणत्या कामांची पाहणी करणार, कोणते रेकॉर्ड पाहणार याबाबत काहीच माहिती नसल्याने अधिकारी- कर्मचारी दबावाखाली वावरत असून, कामे चोख ठेवण्याकडे प्रयत्न करत आहेत.त्यानिमित्त सर्वच कार्यालये सुस्थितीत ठेवणे, रेकॉर्ड लावणे, रंगरंगोटी करून व्यवस्थित करण्यात येत आहेत. आपापल्या विभागात सुरू असलेली कामे नीट कशी होतील याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व पाणीटंचाईच्या काळात समितीचे येणे महत्त्वाचे समजले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती घेण्याकरिता गेले तरी उत्तर एकच येते सध्या आमची पंचायतराज समितीची दौऱ्याची धावपळ सुरू आहे. या समितीपुढे प्रामुख्याने टंचाई परिस्थितीत ग्रामीण पाणीपुरवठा कामकाजाची माहिती तसेच गेल्या तीन महिन्यांपासून या विभागाच्या हरसूल प्रकल्प व त्र्यंबकेश्वर प्रकल्पासाठी बालविकास प्रकल्प अधिकारीच नाहीत. आरोग्य विभागानेही बालमृत्यूची माहिती देण्याचे टाळले आहे. (वार्ताहर)
पंचायतराज समितीचा धसका
By admin | Updated: May 4, 2016 22:56 IST