शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पंचायतराज समितीचा धसका

By admin | Updated: May 4, 2016 22:56 IST

त्र्यंबकेश्वर : कामे सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात पंचायतराज समितीचे आगमन होणार असल्याने पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून, समिती पदाधिकारी कोणकोणत्या कामांची पाहणी करणार, कोणते रेकॉर्ड पाहणार याबाबत काहीच माहिती नसल्याने अधिकारी- कर्मचारी दबावाखाली वावरत असून, कामे चोख ठेवण्याकडे प्रयत्न करत आहेत.त्यानिमित्त सर्वच कार्यालये सुस्थितीत ठेवणे, रेकॉर्ड लावणे, रंगरंगोटी करून व्यवस्थित करण्यात येत आहेत. आपापल्या विभागात सुरू असलेली कामे नीट कशी होतील याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर व पाणीटंचाईच्या काळात समितीचे येणे महत्त्वाचे समजले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती घेण्याकरिता गेले तरी उत्तर एकच येते सध्या आमची पंचायतराज समितीची दौऱ्याची धावपळ सुरू आहे. या समितीपुढे प्रामुख्याने टंचाई परिस्थितीत ग्रामीण पाणीपुरवठा कामकाजाची माहिती तसेच गेल्या तीन महिन्यांपासून या विभागाच्या हरसूल प्रकल्प व त्र्यंबकेश्वर प्रकल्पासाठी बालविकास प्रकल्प अधिकारीच नाहीत. आरोग्य विभागानेही बालमृत्यूची माहिती देण्याचे टाळले आहे. (वार्ताहर)