शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

पंचवटी, राज्यराणी, गोदावरीला ‘इंटरसिटी’ दर्जा

By admin | Updated: February 2, 2017 01:26 IST

महाप्रबंधकांचा निर्णय : निर्धारित वेळेत चालविण्याची प्रशासनावर जबाबदारी

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांसह व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पंचवटीसह गोदावरी व राज्यराणी या तिन्ही रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी इंटरसिटीचा दर्जा दिल्याचे मंगळवारी (दि.३१) जाहीर केले. यामुळे या तिन्ही गाड्या निर्धारित वेळेत चालविण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर आली असून, नाशिककरांना दिलासा मिळणार आहे. मनमाड जंक्शनवरून नाशिकरोडमार्गे मुंबईला दररोज ये- जा करणाऱ्या पंचवटी, गोदावरी, राज्यराणी या सुपर फास्ट एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना विविध कारणास्तव विलंब रेल्वे प्रशासनाकडून केला जात होता. तसेच अनेकदा कसारा किंवा इगतपुरीजवळ दुरांतो एक्स्प्रेसमुळे अनेकवेळा पंचवटीला साइड ट्रॅक करण्यात येत होते. यामुळे निश्चित वेळेत नाशिककरांच्या हक्काच्या असलेल्या तीनही रेल्वेंना मुंबईत पोहचण्यास अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. परिणामी चाकरमान्यांसह व्यावसायिक वर्गाला निर्धारित वेळेत मुंबईत दाखल होता येत नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. तसेच अनेकदा प्रवाशांनी पंचवटीला होणाऱ्या विलंबामुळे आंदोलनेदेखील नाशिकरोड, इगतपुरी व मनमाड येथे केली आहेत. सदर समस्या कायमस्वरूपी निकाली काढली जावी, यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजीव फोकणे यांनी महाप्रबंधक शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. तीनही गाड्यांना ‘इंटरसिटी’चा दर्जा मिळाल्यास निर्धारित वेळेत या गाड्या धावतील, असे मत निवेदनामध्ये मांडण्यात आले होते. एकूणच या तीनही गाड्यांना इंटरसिटीचा दर्जा दिल्याने आता निर्धारित वेळेमध्ये या गाड्या धावणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)