शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने ...

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने धावली. यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पूर्वीप्रमाणेच पंचवटी सर्व सोयीसुविधांसह तिच्या सर्व रेल्वेस्थानकावर थांबा घेऊन सुरू करावी, अशी मागणी दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून २४६ प्रवाशांनी पंचवटीद्वारे मुंबई, ठाणे गाठले.

मुंबई - ठाणे परिसरात उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी कामांसाठी दररोज जाण्यासाठी नाशिककरांसाठी लाइफलाइन रेल्वे ठरली आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या १० मेपासून पंचवटी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. राज्यराणी एक्स्प्रेसच्या मदतीने प्रवासी मुंबई, ठाण्याला जात होते. मात्र राज्यराणीची वेळ ही पंचवटीतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना योग्य नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या गाडीला दादरचा थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. मनमाड - मुंबई असलेली राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेड-मुंबई करण्यात आल्याने ती नांदेड येथूनच प्रवाशांनी भरून येते. त्यामुळे या गाडीत जागाही मिळत नाही. राज्यराणी एक्स्प्रेसला नाशिकचा वेगळा कोटा असला तरी पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने राज्यराणीला नाशिक येथून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.

गेल्या ४६ दिवसांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र शुक्रवारी गेलेली पंचवटी परतीच्या प्रवासाला नसल्याने बहुतांश प्रवाशांनी मुंबई, ठाणे जाणे टाळले. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारी वातानुकूलित १४ व सेकंड क्लास २३२ असे एकूण २४६ प्रवासी मुंबई, ठाण्याला रवाना झाले. मासिक पास सवलत बंद असल्याने प्रवाशांची गर्दी रोडावली आहे तसेच आरक्षण तिकीट अनिवार्य केल्यानेदेखील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

कोरोनामुळे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा रद्द करण्यात आल्याने शहापूर, खर्डी, आटगाव, भिवंडी, आसनगाव, मुरबाड, टिटवाळा, खडवली या भागात नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा सुरू करण्यासोबत सर्वसाधारण तिकीटदेखील अशी मागणी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी कमी असल्याने २२ बोगीची असलेली पंचवटी एक्स्प्रेस एकूण सोळा बोगीची करण्यात आली आहे. पाच सर्वसाधारण बोगी व एक वातानुकूलित अशा बोगी कमी करण्यात आल्या आहेत.

---कोट--

१) पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी पूर्वीप्रमाणे ठेवून सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यासोबत कसारा थांबा देण्याची गरज आहे. राज्यराणीची वेळ नोकरीच्या हिशोबाने गैरसोयीची ठरत असल्याने नाशिककरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वाची आहे. - विठ्ठल गवे, प्रवासी, जेलरोड

२) राज्यराणी एक्स्प्रेसने दररोज मुंबईला जाणे वेळेनुसार सोयीचे होत नाही. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्तामार्गे मुंबईला जात होतो. परंतु आता पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे. - नितीन जगताप, प्रवासी सिडको

३) पंचवटी एक्स्प्रेस मुंबई ठाण्याला दररोज अपडाऊन करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पंचवटी एक्स्प्रेस बंद केल्यामुळे रस्तामार्गे मुंबईला जाणार्‍यांचा उलट जास्त लोकांची संपर्क येत होता. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची जास्त शक्यता आहे. - भीमराव सोनवणे, नाशिक

४) राज्यराणी एक्स्प्रेस ही ठाण्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला थांबत असल्याने तेथे आम्हाला उतरून पुन्हा दादरला यावे लागत होते. त्यामुळे खूप गैरसोय होत होती. मुंबई, ठाण्याला नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच योग्य आहे. - आरती माळी, नाशिकरोड

===Photopath===

250621\25nsk_23_25062021_13.jpg

===Caption===

पंचवटी एक्सप्रेससाठी प्रवाशांची स्थानगात झालेली गर्दी