शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने ...

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने धावली. यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पूर्वीप्रमाणेच पंचवटी सर्व सोयीसुविधांसह तिच्या सर्व रेल्वेस्थानकावर थांबा घेऊन सुरू करावी, अशी मागणी दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून २४६ प्रवाशांनी पंचवटीद्वारे मुंबई, ठाणे गाठले.

मुंबई - ठाणे परिसरात उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी कामांसाठी दररोज जाण्यासाठी नाशिककरांसाठी लाइफलाइन रेल्वे ठरली आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या १० मेपासून पंचवटी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. राज्यराणी एक्स्प्रेसच्या मदतीने प्रवासी मुंबई, ठाण्याला जात होते. मात्र राज्यराणीची वेळ ही पंचवटीतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना योग्य नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या गाडीला दादरचा थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. मनमाड - मुंबई असलेली राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेड-मुंबई करण्यात आल्याने ती नांदेड येथूनच प्रवाशांनी भरून येते. त्यामुळे या गाडीत जागाही मिळत नाही. राज्यराणी एक्स्प्रेसला नाशिकचा वेगळा कोटा असला तरी पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने राज्यराणीला नाशिक येथून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.

गेल्या ४६ दिवसांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र शुक्रवारी गेलेली पंचवटी परतीच्या प्रवासाला नसल्याने बहुतांश प्रवाशांनी मुंबई, ठाणे जाणे टाळले. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारी वातानुकूलित १४ व सेकंड क्लास २३२ असे एकूण २४६ प्रवासी मुंबई, ठाण्याला रवाना झाले. मासिक पास सवलत बंद असल्याने प्रवाशांची गर्दी रोडावली आहे तसेच आरक्षण तिकीट अनिवार्य केल्यानेदेखील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

कोरोनामुळे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा रद्द करण्यात आल्याने शहापूर, खर्डी, आटगाव, भिवंडी, आसनगाव, मुरबाड, टिटवाळा, खडवली या भागात नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा सुरू करण्यासोबत सर्वसाधारण तिकीटदेखील अशी मागणी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी कमी असल्याने २२ बोगीची असलेली पंचवटी एक्स्प्रेस एकूण सोळा बोगीची करण्यात आली आहे. पाच सर्वसाधारण बोगी व एक वातानुकूलित अशा बोगी कमी करण्यात आल्या आहेत.

---कोट--

१) पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी पूर्वीप्रमाणे ठेवून सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यासोबत कसारा थांबा देण्याची गरज आहे. राज्यराणीची वेळ नोकरीच्या हिशोबाने गैरसोयीची ठरत असल्याने नाशिककरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वाची आहे. - विठ्ठल गवे, प्रवासी, जेलरोड

२) राज्यराणी एक्स्प्रेसने दररोज मुंबईला जाणे वेळेनुसार सोयीचे होत नाही. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्तामार्गे मुंबईला जात होतो. परंतु आता पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे. - नितीन जगताप, प्रवासी सिडको

३) पंचवटी एक्स्प्रेस मुंबई ठाण्याला दररोज अपडाऊन करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पंचवटी एक्स्प्रेस बंद केल्यामुळे रस्तामार्गे मुंबईला जाणार्‍यांचा उलट जास्त लोकांची संपर्क येत होता. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची जास्त शक्यता आहे. - भीमराव सोनवणे, नाशिक

४) राज्यराणी एक्स्प्रेस ही ठाण्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला थांबत असल्याने तेथे आम्हाला उतरून पुन्हा दादरला यावे लागत होते. त्यामुळे खूप गैरसोय होत होती. मुंबई, ठाण्याला नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच योग्य आहे. - आरती माळी, नाशिकरोड

===Photopath===

250621\25nsk_23_25062021_13.jpg

===Caption===

पंचवटी एक्सप्रेससाठी प्रवाशांची स्थानगात झालेली गर्दी