शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४६ दिवसांनंतर धावली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने ...

नाशिकरोड : नाशिककर चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी ४६ दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने धावली. यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पूर्वीप्रमाणेच पंचवटी सर्व सोयीसुविधांसह तिच्या सर्व रेल्वेस्थानकावर थांबा घेऊन सुरू करावी, अशी मागणी दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून २४६ प्रवाशांनी पंचवटीद्वारे मुंबई, ठाणे गाठले.

मुंबई - ठाणे परिसरात उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण आदी कामांसाठी दररोज जाण्यासाठी नाशिककरांसाठी लाइफलाइन रेल्वे ठरली आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या १० मेपासून पंचवटी एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. राज्यराणी एक्स्प्रेसच्या मदतीने प्रवासी मुंबई, ठाण्याला जात होते. मात्र राज्यराणीची वेळ ही पंचवटीतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना योग्य नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. या गाडीला दादरचा थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण झाली होती. मनमाड - मुंबई असलेली राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेड-मुंबई करण्यात आल्याने ती नांदेड येथूनच प्रवाशांनी भरून येते. त्यामुळे या गाडीत जागाही मिळत नाही. राज्यराणी एक्स्प्रेसला नाशिकचा वेगळा कोटा असला तरी पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने राज्यराणीला नाशिक येथून जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती.

गेल्या ४६ दिवसांपासून बंद असलेली पंचवटी एक्स्प्रेस शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र शुक्रवारी गेलेली पंचवटी परतीच्या प्रवासाला नसल्याने बहुतांश प्रवाशांनी मुंबई, ठाणे जाणे टाळले. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्रवारी वातानुकूलित १४ व सेकंड क्लास २३२ असे एकूण २४६ प्रवासी मुंबई, ठाण्याला रवाना झाले. मासिक पास सवलत बंद असल्याने प्रवाशांची गर्दी रोडावली आहे तसेच आरक्षण तिकीट अनिवार्य केल्यानेदेखील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

कोरोनामुळे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा रद्द करण्यात आल्याने शहापूर, खर्डी, आटगाव, भिवंडी, आसनगाव, मुरबाड, टिटवाळा, खडवली या भागात नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पंचवटी एक्स्प्रेसचा कसारा थांबा सुरू करण्यासोबत सर्वसाधारण तिकीटदेखील अशी मागणी दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांची गर्दी कमी असल्याने २२ बोगीची असलेली पंचवटी एक्स्प्रेस एकूण सोळा बोगीची करण्यात आली आहे. पाच सर्वसाधारण बोगी व एक वातानुकूलित अशा बोगी कमी करण्यात आल्या आहेत.

---कोट--

१) पंचवटी एक्स्प्रेसच्या बोगी पूर्वीप्रमाणे ठेवून सर्वसाधारण तिकीट सुरू करण्यासोबत कसारा थांबा देण्याची गरज आहे. राज्यराणीची वेळ नोकरीच्या हिशोबाने गैरसोयीची ठरत असल्याने नाशिककरांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही अत्यंत महत्त्वाची आहे. - विठ्ठल गवे, प्रवासी, जेलरोड

२) राज्यराणी एक्स्प्रेसने दररोज मुंबईला जाणे वेळेनुसार सोयीचे होत नाही. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्तामार्गे मुंबईला जात होतो. परंतु आता पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाल्याने मोठी गैरसोय दूर झाली आहे. - नितीन जगताप, प्रवासी सिडको

३) पंचवटी एक्स्प्रेस मुंबई ठाण्याला दररोज अपडाऊन करण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पंचवटी एक्स्प्रेस बंद केल्यामुळे रस्तामार्गे मुंबईला जाणार्‍यांचा उलट जास्त लोकांची संपर्क येत होता. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची जास्त शक्यता आहे. - भीमराव सोनवणे, नाशिक

४) राज्यराणी एक्स्प्रेस ही ठाण्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसला थांबत असल्याने तेथे आम्हाला उतरून पुन्हा दादरला यावे लागत होते. त्यामुळे खूप गैरसोय होत होती. मुंबई, ठाण्याला नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच योग्य आहे. - आरती माळी, नाशिकरोड

===Photopath===

250621\25nsk_23_25062021_13.jpg

===Caption===

पंचवटी एक्सप्रेससाठी प्रवाशांची स्थानगात झालेली गर्दी