शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी

By admin | Updated: July 8, 2014 23:21 IST

देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी

विनायक येसेकर - भद्रावतीज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वच्छतेचे महत्व समाजाला सांगितले. ज्यांच्या नावाने शासनाने स्वच्छता अभियान आणि स्पर्धेच्या योजना सुरू केल्या. अशांचेच पुतळे शहरातील एका मध्यभागात रहदारीच्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून घाणीच्या विळख्यात उभे आहेत. अशी दुरवस्था ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला या महात्म्यांच्या कार्याची महतीच कळली नसावी, असे दिसून येते.संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन्ही महान विभुतींचे पुतळे घुटकाळा वॉर्डातील झाडे प्लॉट भागातील डॉ. संजय ठाकरे यांच्या दवाखान्याजवळील खुल्या जागेवर घाणीच्या विळख्यात गेल्या कित्येक वर्षांपासून उभे आहेत. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेवून गावेच्या गावे झाडून स्वच्छ केली आणि या दरम्यान नागरिकांना स्वच्छतेचे महत्व आपल्या किर्तनातून सांगितले. स्वच्छतेमुळे रोगराई होत नाही. शरीर आणि मन सुदृढ राहते. याची महती त्यांनी समाजाला प्रबोधनातून पटवून दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत याच प्रकारे स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, नागरी स्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामनागरी स्वच्छता अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केले आहे. यात अनेक ग्राम आणि नागरी विभागातील स्थानिक संस्थांनी भाग घेवून पारितोषिकेही पटकाविली आहेत. ज्यांच्या नावाने शासन त्यांच्या कार्याची दखल घेवून एकीकडे स्वच्छतेच्या व निर्मल ग्राम व नागरी स्पर्धा राबवित असताना याठिकाणी मात्र या दोन्ही विभूती कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभ्या आहेत. यासंदर्भात काही सुज्ञ नागरिकांनी नगर प्रशासनाला सूचना करुन देखील त्यांनी आजतागायत याकडे लक्ष दिले नाही. याच विभुतींच्या नावे काही सामाजिक संस्था दरवर्षी मोठमोठे कार्यक्रम राबवून लाखो रुपये खर्ची घालतात. परंतु या संस्थाच्या प्रमुखांचे लक्ष सुद्धा या विभूतींच्या पुतळ्यांकडे गेले नसावे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पालिकेचा दुर्लक्षितपणा संताप आणणारा आहे.