शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी

By admin | Updated: July 8, 2014 23:21 IST

देवरगाव येथे आषाढीनिमित्त पालखी

विनायक येसेकर - भद्रावतीज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात स्वच्छतेचे महत्व समाजाला सांगितले. ज्यांच्या नावाने शासनाने स्वच्छता अभियान आणि स्पर्धेच्या योजना सुरू केल्या. अशांचेच पुतळे शहरातील एका मध्यभागात रहदारीच्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून घाणीच्या विळख्यात उभे आहेत. अशी दुरवस्था ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला या महात्म्यांच्या कार्याची महतीच कळली नसावी, असे दिसून येते.संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोन्ही महान विभुतींचे पुतळे घुटकाळा वॉर्डातील झाडे प्लॉट भागातील डॉ. संजय ठाकरे यांच्या दवाखान्याजवळील खुल्या जागेवर घाणीच्या विळख्यात गेल्या कित्येक वर्षांपासून उभे आहेत. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेवून गावेच्या गावे झाडून स्वच्छ केली आणि या दरम्यान नागरिकांना स्वच्छतेचे महत्व आपल्या किर्तनातून सांगितले. स्वच्छतेमुळे रोगराई होत नाही. शरीर आणि मन सुदृढ राहते. याची महती त्यांनी समाजाला प्रबोधनातून पटवून दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत याच प्रकारे स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, नागरी स्पर्धा आणि संत गाडगेबाबा ग्रामनागरी स्वच्छता अभियान गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केले आहे. यात अनेक ग्राम आणि नागरी विभागातील स्थानिक संस्थांनी भाग घेवून पारितोषिकेही पटकाविली आहेत. ज्यांच्या नावाने शासन त्यांच्या कार्याची दखल घेवून एकीकडे स्वच्छतेच्या व निर्मल ग्राम व नागरी स्पर्धा राबवित असताना याठिकाणी मात्र या दोन्ही विभूती कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभ्या आहेत. यासंदर्भात काही सुज्ञ नागरिकांनी नगर प्रशासनाला सूचना करुन देखील त्यांनी आजतागायत याकडे लक्ष दिले नाही. याच विभुतींच्या नावे काही सामाजिक संस्था दरवर्षी मोठमोठे कार्यक्रम राबवून लाखो रुपये खर्ची घालतात. परंतु या संस्थाच्या प्रमुखांचे लक्ष सुद्धा या विभूतींच्या पुतळ्यांकडे गेले नसावे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच पालिकेचा दुर्लक्षितपणा संताप आणणारा आहे.