शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

येवल्यात पालखेडचे पाणी पेटले

By admin | Updated: December 22, 2016 00:40 IST

चार अत्यवस्थ : तीन दिवसानंतरही अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नाही

येवला : तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालखेडचे पाणी येवला तालुक्यात चांगलेच पेटले आहे. उपोषणकर्त्यांची स्थानिक प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाही. उपोषणस्थळी कोणीही शासकीय अधिकारी फिरकलेले नाहीत. दरम्यान, ७२ तास उलटल्यानंतर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. ज्येष्ठ नागरिक भगवान भागवत (६७), तसेच भास्कर भागवत (६५) आणि संदीप लभडे (३५) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने शहरातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीप्रश्नावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने, रास्ता रोको केलेले आहेत. कित्येक जण कुटुंबातील महिलांसह नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन आलेले आहेत. तरीही अद्याप प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. दरम्यान, आज उपोषणस्थळी शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, शेतकरी संघटना नेते संतू पा. झांबरे, कुणाल दराडे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. जलसंपदाचे साचेबंद उत्तर पालखेड धरणसमूहाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी या उपोषणाबाबत नेहमीचेच साचेबंद उत्तर दिले आहे. धरणांमध्ये गाळ साठला असून, साठवण क्षमता कमी झाली आहे. मृत साठाही कमी झाला आहे. कालव्याची वहन क्षमता फक्त ३० टक्के आहे. म्हणजे एकूण पाण्याचा ७० टक्के वहनव्यय होतो. पण या वहनव्ययावर पालखेड प्रशासनाने आजवर काय केले हे मात्र सांगितले नाही. तसेच पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर होतो की व्यापार होतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, उर्ध्व भागातील अनेक पाणी वापर संस्थांनी पाणी घेतलेले नाही. मग, आवर्तनाचे पाणी नेमके जाते कुठे, याचा ताळेबंद अधिकाऱ्यांनी द्यावा, अशीही मागणी आंदोलक करीत आहेत. (वार्ताहर) येवला तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्र मांक ४६ ते ५२ ला पालखेडच्या चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.