शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

येवल्यात पालखेडचे पाणी पेटले

By admin | Updated: December 22, 2016 00:40 IST

चार अत्यवस्थ : तीन दिवसानंतरही अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नाही

येवला : तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्रमांक ४६ ते ५२ या आठमाही करण्यासाठी व चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पालखेडचे पाणी येवला तालुक्यात चांगलेच पेटले आहे. उपोषणकर्त्यांची स्थानिक प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाही. उपोषणस्थळी कोणीही शासकीय अधिकारी फिरकलेले नाहीत. दरम्यान, ७२ तास उलटल्यानंतर काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. ज्येष्ठ नागरिक भगवान भागवत (६७), तसेच भास्कर भागवत (६५) आणि संदीप लभडे (३५) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने शहरातील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणीप्रश्नावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक आंदोलने, रास्ता रोको केलेले आहेत. कित्येक जण कुटुंबातील महिलांसह नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात जाऊन आलेले आहेत. तरीही अद्याप प्रश्न प्रलंबित असून, शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. दरम्यान, आज उपोषणस्थळी शिवसेना नेते संभाजी पवार, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, शेतकरी संघटना नेते संतू पा. झांबरे, कुणाल दराडे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला. जलसंपदाचे साचेबंद उत्तर पालखेड धरणसमूहाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी यांनी या उपोषणाबाबत नेहमीचेच साचेबंद उत्तर दिले आहे. धरणांमध्ये गाळ साठला असून, साठवण क्षमता कमी झाली आहे. मृत साठाही कमी झाला आहे. कालव्याची वहन क्षमता फक्त ३० टक्के आहे. म्हणजे एकूण पाण्याचा ७० टक्के वहनव्यय होतो. पण या वहनव्ययावर पालखेड प्रशासनाने आजवर काय केले हे मात्र सांगितले नाही. तसेच पालखेड कालवा प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्या असून, पाण्याचा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापर होतो की व्यापार होतो, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण, उर्ध्व भागातील अनेक पाणी वापर संस्थांनी पाणी घेतलेले नाही. मग, आवर्तनाचे पाणी नेमके जाते कुठे, याचा ताळेबंद अधिकाऱ्यांनी द्यावा, अशीही मागणी आंदोलक करीत आहेत. (वार्ताहर) येवला तालुक्याच्या पूर्व भागातील वितरिका क्र मांक ४६ ते ५२ ला पालखेडच्या चालू आवर्तनातून पिण्यासाठी बंधारे भरून देण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.