शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पालखेडचे पाणी थांबले

By admin | Updated: April 16, 2016 00:32 IST

गुन्हे दाखल : शेतकरी सैरभैर

नाशिक : येवला, मनमाडसाठी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पुढील काही महिने येवला, नांदगाव तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र डाव्या कालव्यातून पाणीचोरी करणारे शेतकरी पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने सैरभैर झाले आहेत. गेल्या आठवड्यात पालखेड धरणातून पाचशे दशलक्ष घनफूट पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले. सुमारे ८५ किलोमीटर अंतर कापून दोन दिवसांनी पाणी येवला तालुक्यातील पाटोदा साठवण तलावापर्यंत पोहोचले, तत्पूर्वी वाटेत पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासन व पाटंबधारे खात्याने पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या मोहिमेत सुमारे सात हजारांहून अधिक डोंगळे उद््ध्वस्त करण्यात आले, तर राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाण्याची राखण करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. परंतु तरीही पोलिसांची पाठ फिरताच, रातोरात शेतकऱ्यांकडून कालव्यात डोंगळे टाकून पाणीचोरी केली गेली. लासलगाव, निफाड, येवला तालुका पोलिसांत अशाप्रकारे दहा गुन्हे दाखल करण्यात आले. पाण्याचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे कालव्याला पाणी असेपर्यंत पोलिसांनी सबुरीची भूमिका घेत गुन्हे दाखल असलेल्या शेतकऱ्यांना अटक केली नाही, आता मात्र धरणातून पाणी सोडणे बंद झाले असून, कालव्यातही जेमतेम पाणी वाहत आहे, अशा परिस्थितीत पोलिसांनी आता पाणीचोरी प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत.