शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पालखेडच्या पाण्यापासून जनता वंचित !

By admin | Updated: August 9, 2016 00:32 IST

येवला : खंबीर नेतृत्वाचा अभाव, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

 येवला : गेल्या चार वर्षांपासून पालखेडचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्याची हेळसांड होत आहे. या पाण्याच्या अभावामुळे शेतकरी पुरता संपला आहे. तालुक्यातील शेती हा विषय शाश्वत राहिलेला नाही. येवला दुष्काळी केंद्रस्थानी मानून जिल्ह्याात धरणांची निर्मिती करण्यात आली. परंतु खंबीर राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे पाण्याबाबत येवलेकरांना न्याय मिळाला नाही हे वास्तव आहे.सुरगाणा, दिंडोरीसह धरणसमूह भागात पावसाचे प्रमाण वाढून धरणे ओव्हरफ्लो झाली. तरीही अभावेनेच पूरपाणी मिळते. मराठवाड्यासह जायकवाडीसाठी कादवा नदीतून पूरपाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतोे. परंतु येवला तालुका मात्र पाण्यावाचून कायम तहानलेलाच आहे. तळकोकण म्हणून संबोधले जाणाऱ्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा या क्षेत्रात वाघाड, करंजवन, चणकापूर, ओझरखेड, पुणेगाव ही धरणे व पालखेडचा बंधारा येतो. ही धरणेदेखील अभावानेच भरतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने गेल्या चार वर्षांत प्रथमच पूरपाणी सोडले गेले. तरीही येवला तहानलेलाच आहे. शासन येवल्याच्या वतीने पाण्याच्या दुर्भिक्षाची बाजू मांडणार आहे किंवा नाही, असा सवाल शेतकरी करीत आहे. येवला केंद्रस्थानी मानून धरणांची निर्मिती झालेली असतानाही याचा फायदा केवळ नगर व मराठवाड्यालाच होत आहे. येवला मात्र तहानेने व्याकूळ असल्याची शोकांतिका आहे.केंद्राचा नदीजोड प्रकल्पसंदर्भात क्रांतिकारी योजनेची घोषणा झाली खरी, परंतु त्यात नारपार प्रकल्पाचा समावेश नाही. पश्चिमवहिनी नद्या पूर्वविहनी म्हणून प्रवाहित करण्याची भूमिका घेऊन, प्रशासकीय मान्यतेसह अर्थसंकल्पीय तरतूद केली तर निश्चितपणे चांदवड, नांदगाव, येवला व मालेगाव या भागात शेतीसाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु सर्वेक्षण होऊनही हा प्रकल्प धूळ खात पडला आहे. नार-पारच्या उगमस्थानापासून अरबी समुद्र अगदी ५० ते ६० किमी अंतरावर आहे. बारमाही असलेल्या या नद्या थेट समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. रखडलेला मांजरपाडादेखील पूर्णत्वास जात नाही. केवळ पाऊण किलोमीटरचे बोगद्याच्या कामासह काही किरकोळ कामे बाकी आहेत. परंतु या कामाकडे कोणाला लक्ष देण्यासाठी वेळही नाही. केंद्राने मदत देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट लोकसभेत केली असली तरी त्याच सततचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. अन्यथा येवल्यासह चांदवडमध्ये कायमच पाण्याचे दुर्भिक्ष राहणार आहे यात शंका नाही. पूरपाणी येवल्याला का नाही? याबाबत अधिकारीदेखील याचिका दाखल असल्याचे सांगून जायकवाडीचे आणि मराठवाड्याचे, पालखेड डाव्या कालव्याचा पाणी सोडण्याचा विषयच नसल्याचे म्हणत आहे. (वार्ताहर)