शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या पाण्यापासून जनता वंचित !

By admin | Updated: August 9, 2016 00:32 IST

येवला : खंबीर नेतृत्वाचा अभाव, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

 येवला : गेल्या चार वर्षांपासून पालखेडचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी येवला तालुक्याची हेळसांड होत आहे. या पाण्याच्या अभावामुळे शेतकरी पुरता संपला आहे. तालुक्यातील शेती हा विषय शाश्वत राहिलेला नाही. येवला दुष्काळी केंद्रस्थानी मानून जिल्ह्याात धरणांची निर्मिती करण्यात आली. परंतु खंबीर राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळे पाण्याबाबत येवलेकरांना न्याय मिळाला नाही हे वास्तव आहे.सुरगाणा, दिंडोरीसह धरणसमूह भागात पावसाचे प्रमाण वाढून धरणे ओव्हरफ्लो झाली. तरीही अभावेनेच पूरपाणी मिळते. मराठवाड्यासह जायकवाडीसाठी कादवा नदीतून पूरपाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येतोे. परंतु येवला तालुका मात्र पाण्यावाचून कायम तहानलेलाच आहे. तळकोकण म्हणून संबोधले जाणाऱ्या पेठ, दिंडोरी, सुरगाणा या क्षेत्रात वाघाड, करंजवन, चणकापूर, ओझरखेड, पुणेगाव ही धरणे व पालखेडचा बंधारा येतो. ही धरणेदेखील अभावानेच भरतात. यंदा पाऊस चांगला झाल्याने गेल्या चार वर्षांत प्रथमच पूरपाणी सोडले गेले. तरीही येवला तहानलेलाच आहे. शासन येवल्याच्या वतीने पाण्याच्या दुर्भिक्षाची बाजू मांडणार आहे किंवा नाही, असा सवाल शेतकरी करीत आहे. येवला केंद्रस्थानी मानून धरणांची निर्मिती झालेली असतानाही याचा फायदा केवळ नगर व मराठवाड्यालाच होत आहे. येवला मात्र तहानेने व्याकूळ असल्याची शोकांतिका आहे.केंद्राचा नदीजोड प्रकल्पसंदर्भात क्रांतिकारी योजनेची घोषणा झाली खरी, परंतु त्यात नारपार प्रकल्पाचा समावेश नाही. पश्चिमवहिनी नद्या पूर्वविहनी म्हणून प्रवाहित करण्याची भूमिका घेऊन, प्रशासकीय मान्यतेसह अर्थसंकल्पीय तरतूद केली तर निश्चितपणे चांदवड, नांदगाव, येवला व मालेगाव या भागात शेतीसाठी त्याचा फायदा होणार आहे. परंतु सर्वेक्षण होऊनही हा प्रकल्प धूळ खात पडला आहे. नार-पारच्या उगमस्थानापासून अरबी समुद्र अगदी ५० ते ६० किमी अंतरावर आहे. बारमाही असलेल्या या नद्या थेट समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. रखडलेला मांजरपाडादेखील पूर्णत्वास जात नाही. केवळ पाऊण किलोमीटरचे बोगद्याच्या कामासह काही किरकोळ कामे बाकी आहेत. परंतु या कामाकडे कोणाला लक्ष देण्यासाठी वेळही नाही. केंद्राने मदत देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट लोकसभेत केली असली तरी त्याच सततचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. अन्यथा येवल्यासह चांदवडमध्ये कायमच पाण्याचे दुर्भिक्ष राहणार आहे यात शंका नाही. पूरपाणी येवल्याला का नाही? याबाबत अधिकारीदेखील याचिका दाखल असल्याचे सांगून जायकवाडीचे आणि मराठवाड्याचे, पालखेड डाव्या कालव्याचा पाणी सोडण्याचा विषयच नसल्याचे म्हणत आहे. (वार्ताहर)