शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

दिव्यांगांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:46 IST

धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले़

नाशिक : धनाढ्य वा राजकारण्यांच्या घरात नव्हे तर वेदना व प्रतिभा यांच्या संगमाच्या ठिकाणी साहित्यनिर्मिती होते़ वेदनेला प्रतिभा व प्रतिभेला वेदनेचा स्पर्श साहित्यनिर्मितीसाठी हवा असतो़ वेदना सहन करण्याचे वा त्यासह जीवन सुंदर पद्धतीने जगण्याची प्रेरणा दिव्यां गांकडून मिळते़ जगातील अव्वल दर्जाच्या साहित्यनिर्मितीत दिव्यांगांचा मोठा वाटा असून, त्यांच्या साहित्यातून वेदनांचा जल्लोष व्यक्त होतो़, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले़  गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्समध्ये आयोजित दोनदिवसीय सातव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी कांबळे बोलत होते़ पुढे बोलताना ते म्हणाले की, निसर्ग केवळ वेदना देत नाही तर त्याचबरोबर सदृढ मन, तल्लख मेंदू, प्रतिभा व वेदना सहन करण्याची ताकदही देतो़ शरीराने सुदृढ मात्र मनाने पांगळ्या असलेल्यांना दिव्यांग हे दररोज जिंकणाऱ्या लढाईद्वारे प्रेरणा देतात़ त्यामुळे स्वत:चा तिरस्कार न करता अलौकिक प्रतिभेतून साहित्यनिर्मिती करा, असे कांबळे यांनी सांगितले़  संमेलनाच्या अध्यक्षा इंदरजित नंदन यांनी, देशपातळीवरील दिव्यांग साहित्यिकांना भेटण्याची संधी व त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगत अधिकारांप्रती जागरूक असलेल्या दिव्यांगाची प्रचिती आल्याचे सांगितले़ पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात कमी नसून या प्रकारच्या साहित्य संमेलनातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले़ तर नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी दोनदिवसीय संमेलनाचा आढावा घेतला़ यावेळी व्यासपीठावर साहित्य व सांस्कृतिक मंडळ पुणेचे अध्यक्ष बापूसाहेब बोभाटे, सचिव नीलेश छडवेलकर, विश्वस्त सुहास तेंडुलकर, संयोजन समितीचे अध्यक्ष सचिन पानमंद, उपाध्यक्ष भावना विसपुते, शारदा गायकवाड, कार्याध्यक्ष सुनील रुणवाल, कार्यवाहक पांडुरंग भोर उपस्थित होते़यशोगाथेतून मिळाली प्रेरणाभारत-पाक युद्धात शरीरात नऊ गोळ्या घुसल्याने अपंगत्व आल्यानंतरही हार न मानता जागतिक जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मुरलीकांत पेटकर यांनी मुलाखतीत आपला जीवनप्रवास उलगडून दाखविला़ तर दिव्यांग असतानाही जिद्दीच्या जोरावर नायब तहसीलदार पदावर काम करणाºया हंसराज पाटील यांची सुनील रुणवाल यांनी प्रकट मुलाखत घेतली़संमेलनातील ठरावएक देश, एक नाव, एक पेन्शन मिळावी (दिव्यांगांना दिल्ली सरकार दोन हजार रुपये, महाराष्ट्र सरकार ६०० तर उत्तर प्रदेश सरकार ३०० रुपये पेन्शन देते़ ) भारत हा एक देश, अंध अपंगांना दिव्यांग हे एक नाव तसेच देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दिव्यांगांना मिळणारी पेन्शनही एक समान असावी़, किमान मूलभूत गरजा पूर्ण करता येतील अशा सुविधा सरकारने दिव्यांगांसाठी उपलब्ध करून द्याव्यात़दिव्यांग साहित्य संमेलनामध्ये सकाळच्या सत्रात झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनाने कवींनी सादर केलेल्या कवितांनी चांगलीच रंगत आणली़ या कविसंमेलनात दिलशान मेहंदी, उमा देवी (उ.प्र.), पालवेंद्र सिंह (राजस्थान), विकास कुमार, पंकज कुमार (बिहार), सुशीलकुमार (जम्मू-काश्मीर) या कवींनी सहभाग घेतला होता़

टॅग्स :literatureसाहित्य