शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पावसाअभावी संरक्षित पाण्यावर भातलावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद ...

नांदूरवैद्य : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, तसेच टाकेद परिसरातील धामणगाव, अडसरे, अधरवड, भरविर खुर्द, मायदरा, बांबळेवाडी आदी परिसरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे भात लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यातच तालुक्यातील धरणांच्या जलसाठ्यात देखील पुरेसा साठा नसल्यामुळे विहिरी, बोअरवेलचा आधार घेत संरक्षित केलेल्या पाण्यावर भातलावणी करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.

इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत अत्यंत कमी पावसाची नोंद झाली असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पावसामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तालुक्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिशय कमी जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या भात पिकाची लागवड करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील टाकेद, धामणगाव, भरवीर, अडसरे, सोनोशी, मायदरा आदी असलेल्या डोंगराळ भागातही हीच परिस्थिती आहे. वाडीवऱ्हे, वैतरणा, सांजेगाव, म्हसुर्ली, नागोसली या पश्चिम पट्ट्यात पाऊस असल्याने या भागात भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. मात्र, तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापपर्यंत पाऊसच नसल्याने लागवडी सुरू झालेल्या नाहीत. इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्यातील अति पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मात्र, भौगोलिक विचार केल्यास तालुक्याच्या निम्म्याहून अधिक भागात चालू वर्षी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

---------------------

लागवडीला वीज पुरवठ्याचा खोडा

आधीच पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भात लागवडी सुरू आहेत. परंतु वीजपुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने शेती कामात व्यत्यय येत असल्याने अडचणी कायम आहेत. अनेक वेळा टाकेद भागात सर्रासपणे वीजपुरवठा खंडित होतो आहे तर विजेचा लपंडाव होतानाचे चित्र असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त होत आहेत.

-------------------

सध्या पावसाची तुरळक रिमझिम व मध्येच होणाऱ्या उघडीपमुळे ऊन पडत असल्याने शेतकरीवर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. भात रोपे तयार असून, केवळ पावसाच्या पाण्याअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. पावसाअभावी रोपे पिवळी पडत असून, खराब होण्याच्या मार्गावर आहेत. आजही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा प्रश्न कायम आहे.

- पांडुरंग वारुंगसे, शेतकरी.)

इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे पावसाअभावी आरक्षित पाण्यावर भाताची लावणी करतांना शेतकरी. (०६ नांदूरवैद्य १)

060721\06nsk_3_06072021_13.jpg

०६ नांदूरवैद्य १