शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामपालिकेने देवी ट्रस्टपुढे पसरला पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

शासनाने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे गडावरील यावर्षीचा चैत्रोत्सवही रद्द केल्याने येथील व्यावसायिकांसह ...

शासनाने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश काढलेले आहेत. त्यामुळे गडावरील यावर्षीचा चैत्रोत्सवही रद्द केल्याने येथील व्यावसायिकांसह व ग्रामस्थांची नाराजी पाहायला मिळाली. गतवर्षीही शासनाने लाॅकडाऊन लावला होता तेव्हाही देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद होते; परंतु यावर्षी कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसह ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी ट्रस्टने लाॅकडाऊनच्या काळात गावात चौकाचौकात जाऊन मोफत भोजन ग्रामस्थांना दिले होते. याठिकाणी अन्य कुठलाही व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. येथील ग्रामस्थांचा रोजगार व व्यवसाय पूर्णत: बंद झालेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना ट्रस्टकडून सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस पोळी-भाजी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने ट्रस्टकडे पत्राद्वारे केली आहे.

कोट....

गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजार असून सप्तशृंगगडावर कडकडीत बंद पाळला जात असल्याने सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. गावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून ट्रस्टने त्वरित निर्णय घेऊन ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था करावी.

- ईश्वर कदम, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष

कोट....

कोरोनामुळे गतवर्षी लाॅकडाऊन असल्याने सप्तशृंगगडवासीयांची वाईट परिस्थिती झाली होती. पुन्हा एप्रिल महिन्यापासून तीच परिस्थिती उद्भवली असून येथे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून फक्त पूजा साहित्य आदी व्यवसाय आहेत. ग्रामपंचायतीने गेल्या आठ दिवसांपासून पत्राद्वारे मागणी केली असून ट्रस्टने अद्याप कुठलीही भूमिका घेतलेली नाही. - दीपक जोरवर, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस