शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ओझर गावातील पूल बनले धोकादायक

By admin | Updated: November 6, 2016 22:45 IST

ओझर गावातील पूल बनले धोकादायक

ओझर : येथील बाणगंगा नदीवरील लहान पूल निमुळते आणि कठड्याविना धोकादायक बनले आहेत. या पुलांवरून पायी चालणे तसेच वाहन चालविणेही धोक्याचे ठरले आहे. आताच्या झालेल्या पावसाळ्यात दोनदा बाणगंगा नदीला महापूर आला. यात कधी नव्हे इतकी वाढलेली पातळी ओझरकरांनी अनुभवली असली तरी गावात येतेवेळी एकूण तीन पुलांवरून यावे लागते. मारुती वेस जवळील पूल, जुना सायखेडारोड येथील शिंदे मळा, आमदार वस्ती, शेलार वस्ती, भडके वस्ती, रासकर मळा, पगार वस्तीला जाणारा पूल आणि नवीन इंग्रजी शाळेजवळील पादचारी पूल. दरवर्षी या तिन्ही पुलांना पुराचा फटका बसणे ही नित्याची बाब झाली आहे. यंदादेखील महापुरामुळे सदर पुलांचे कठडे वाहून गेले. कारण पाण्याच्या विसर्गाने पूल दिसेनासे झाले. सध्याही तिन्ही पूल अनाथ अवस्थेत असून, दररोज यावरून मोठी वर्दळ सुरू असते. नवीन इंग्रजी शाळेजवळील पादचारी पुलाजवळ भीमगर्जनानगर असून, त्याला लागूनच नवीन इंग्रजी शाळा आहे. समोरच्या बाजूला माधवराव बोरस्ते विद्यालय असून, दररोज येथून अनेक विद्यार्थी ये-जा करीत असतात. परंतु सदर पुलाला कठडे नसून पूल अधांतरी अवस्थेमध्ये आहे. पुलावरील रस्तादेखील पूर्णपणे उखडून गेला आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नेहमी गडद अंधार असतो. येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. जुना सायखेडा रस्त्यावरील पूलदेखील याच अवस्थेमध्ये असून, अर्ध्याहून अधिक पुलाचे कठडे हे पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेमध्ये आहे. या पुलाचा वापर हा वाहन आणि पायी दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असून, सामान्य नागरिकांबरोबर शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध आपल्या शेतमालाची ने-आण येथून करतात. ओझरच्या अनेक दिग्गजांनादेखील हा पूल ओलांडूनच गावात यावे लागते. अनेक लहान मुलेदेखील शाळेत या पुलावरून जातात. परंतु पूर येऊन तीन महिन्यांच्या वर काळ लोटला तरी कठडे मात्र ‘जैसे थे’च आहेत.