शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

ओझर : दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान द्राक्ष हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:47 IST

द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.

ओझर : द्राक्ष उत्पादनासाठी लागणाºया पोषक वातावरण व इतर बाबींचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा निम्म्याहून अधिक नुकसान बागायतदारांना सोसावे लागणार आहे.भारतीय द्राक्ष बाजारात नाशिक जिल्हा सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचे कारण म्हणजे येथील हवामान द्राक्षासाठी पोषक आहे. द्राक्षांना दोन प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत, एक जागतिक आणि दुसरी भारतीय. थंडीमुळे द्राक्षातील साखरेचे प्रमाण घटते. परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने द्राक्षमण्यांची फुगवण क्षमता व गोडी कमी झाल्याने उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणी कमी झाली व उत्पन्नदेखील तीस टक्के घटले. राज्यातून द्राक्ष निर्यात हंगामाचा श्रीगणेशा करणारा पट्टा म्हणून कसमादे पट्ट्याची ओळख आहे. नोव्हेंबरमध्ये नॉन युरोप देशात चांगल्याप्रकारे निर्यात याच भागातील द्राक्षांनी केली. सर्वात जास्त उत्पन्न घेणारा भाग म्हणून या पट्ट्याचा लौकिक आहे; मात्र तेथील बागायतदार मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. आॅक्टोबरमध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे डावणीचा प्रादुर्भाव होऊन फुलोºयाची गळ व कुज प्रचंड झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यातून सावरत असताना ऐन माल तयार होत असताना गेल्या आठवड्यात झालेला ओखीचा पाऊस जखमेवर मीठ चोळून गेला आहे. त्यामध्ये तयार झालेल्या द्राक्ष घडांमध्ये मणी तडकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कसमादे पट्ट्यातील मुख्यत: सटाणा तालुक्यातील नुकसान हे निम्म्याहून अधिक आहे. नाशिक विभागात आॅक्टोबरमधील गोडबहार छाटणीदरम्यान झालेल्या बेमोसमी पावसाने डावणीचा प्रादुर्भाव होऊन घड जिरण्याचे प्रमाण अधिक झाले. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात घडनिर्मिती झाली असून, त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर झाला आहे. एकसारख्या मालाची कमतरता यंदा मोठ्या प्रमाणात दिसून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीय बाजारातदेखील याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. निर्यातीचा विचार केल्यास यंदा प्रमाणापेक्षा जास्त थंडी पडत असल्यामुळे निर्यातक्षम प्रत मिळवणे अवघड ठरत आहे. पाऊस व अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च दुप्पट होत आहे. सर्व बाबींचा विचार करता यंदाचा द्राक्ष हंगाम बागायतदारांना गोड ठरण्याची शक्यता धूसर असल्याचे आजमितीस चित्र उभे राहिले आहे.