शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ओझर : दारिद्र्यरेषेखालील असणाºयांसाठीचे लाभ आता सर्वांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार एक लाख रुपये जमा करणारसोन्याचे नाणे भेट देण्यात येणार

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार असून, सरकारने त्याची अट शिथिल करत दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करण्याचे निश्चित केले आहे.  समाजात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा करून दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्माला आलेली मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर राज्य सरकार तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा प्रारंभीच्या काळात फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच लाभ घेता येत होता. राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने यात आमूलाग्र बदल करीत आता सुधारित आदेशानुसार याचा लाभ कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाला घेता येणार आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कुटुंबात दि. १ एप्रिल २०१६ नंतर एका कन्येचा जन्म झाला तर ती कन्या १८ वर्षांची झाल्यावर राज्य शासन तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. याव्यतिरिक्त ती कन्या १८ वर्षांची होईपर्यंत विविध टप्प्यांवर शासनाच्या मुलींसाठी असणाºया योजनांचा लाभदेखील तिला मिळणार आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुलीच्या आजी- आजोबांना पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. ती मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. पाच वर्षांची मिळून होणारी रक्कम दहा हजार इतकी असून, मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये शासन देणार आहे. या पाच वर्षांत एकूण रक्कम साडेबारा हजार रुपये होणार असून, त्यापुढील शिक्षणासाठी म्हणजेच सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी तीन हजार शासन देणार असून, ही रक्कम २१ हजार इतकी होणार आहे. याच दरम्यान मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एकरकमी एक लाख रुपये शासन तिच्या नावावर करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची महत्त्वपूर्ण अट घातली आहे. राज्य शासनाच्या या योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुका बालविकास प्रकल्प अधिकाºयाकडे उपलब्ध आहे. योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली असून, संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेच्या अर्ध्या रकमेचा लाभ मिळणार आहे.