शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओझर : दारिद्र्यरेषेखालील असणाºयांसाठीचे लाभ आता सर्वांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार एक लाख रुपये जमा करणारसोन्याचे नाणे भेट देण्यात येणार

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार असून, सरकारने त्याची अट शिथिल करत दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करण्याचे निश्चित केले आहे.  समाजात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा करून दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्माला आलेली मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर राज्य सरकार तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा प्रारंभीच्या काळात फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच लाभ घेता येत होता. राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने यात आमूलाग्र बदल करीत आता सुधारित आदेशानुसार याचा लाभ कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाला घेता येणार आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कुटुंबात दि. १ एप्रिल २०१६ नंतर एका कन्येचा जन्म झाला तर ती कन्या १८ वर्षांची झाल्यावर राज्य शासन तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. याव्यतिरिक्त ती कन्या १८ वर्षांची होईपर्यंत विविध टप्प्यांवर शासनाच्या मुलींसाठी असणाºया योजनांचा लाभदेखील तिला मिळणार आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुलीच्या आजी- आजोबांना पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. ती मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. पाच वर्षांची मिळून होणारी रक्कम दहा हजार इतकी असून, मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये शासन देणार आहे. या पाच वर्षांत एकूण रक्कम साडेबारा हजार रुपये होणार असून, त्यापुढील शिक्षणासाठी म्हणजेच सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी तीन हजार शासन देणार असून, ही रक्कम २१ हजार इतकी होणार आहे. याच दरम्यान मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एकरकमी एक लाख रुपये शासन तिच्या नावावर करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची महत्त्वपूर्ण अट घातली आहे. राज्य शासनाच्या या योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुका बालविकास प्रकल्प अधिकाºयाकडे उपलब्ध आहे. योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली असून, संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेच्या अर्ध्या रकमेचा लाभ मिळणार आहे.