शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

अतिवृष्टी झाली, कोणी नाही पाहिली !

By admin | Updated: June 17, 2017 01:16 IST

नाशिक : जलप्रलयामुळे शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी नाशकात झालेल्या जलप्रलयामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले असले तरी, या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली असून, दोन वर्षांपूर्वी शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी निश्चित केलेल्या निकषावर शासकीय यंत्रणेवर बोट ठेवले आहे. शहर व परिसराला बुधवारी धुवाधार पावसाने झोडपून काढले. वादळीवारा, विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या या पावसाने अवघ्या काही मिनिटातच शहराची दाणादाण उडविली. अख्खे शहर वेठीस धरून जनजीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या पावसामुळे नाशिक जागच्या ठप्प झाले. रस्त्यांवर गुढग्याइतके पाणी साचून ते सखल भागाकडे वेगाने वाहिल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर सराफबाजार, हुंडीवाला लेन, शालिमार चौक, पंचवटीतील रामकुंड परिसरातील दुकानांनाही पाण्याने विळखा घातल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी वीज पंपाचा आधार घ्यावा लागला तर नागरिकांना स्वत:च पाणी उपसून बाहेर काढावे लागले. नाशिक महापालिकेची भुयारी गटार योजना रस्त्यातील पाणी वाहून नेण्यास अपयशी ठरल्याची बाबही या निमित्ताने उघडकीस आली. अवघ्या दीड तासात शहरात ९२ मिली मीटर म्हणजेच चार इंच पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली. शासनाच्या निकषानुसार ६५ मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्याची नोंद ‘अतिवृष्टी’ म्हणून केली जाते, अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे निश्चितच हानी होत असल्याचे शासनानेच मान्य केले आहे. परंतु बुधवारच्या पावसामुळे शहरवासीयांचे काहीच नुकसान झाले नसल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर त्याबाबत पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना नाशिक तहसीलदारांना देण्यात आल्या, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ज्या ज्या जागांवर पाणी साचले तेथे जाऊन पाहणी केली, मात्र कोठेही ४८ तास पाणी साचलेले आढळून आले नाही. शासनाने १३ मे २०१५ रोजी अतिवृष्टीने नुकसान झाल्यास त्याच्या नुकसानीची भरपाई कशी द्यायची याबाबत निकष ठरवून दिले असून, त्या निकषामध्ये नाशिक शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद बसत नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली असली तरी, ती शासकीय यंत्रणेने पाहिलेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.