शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

अतिवृष्टी झाली, कोणी नाही पाहिली !

By admin | Updated: June 17, 2017 01:16 IST

नाशिक : जलप्रलयामुळे शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी नाशकात झालेल्या जलप्रलयामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरून घरगुती व व्यावसायिक नुकसान झालेले असले तरी, या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली असून, दोन वर्षांपूर्वी शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसाठी निश्चित केलेल्या निकषावर शासकीय यंत्रणेवर बोट ठेवले आहे. शहर व परिसराला बुधवारी धुवाधार पावसाने झोडपून काढले. वादळीवारा, विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या या पावसाने अवघ्या काही मिनिटातच शहराची दाणादाण उडविली. अख्खे शहर वेठीस धरून जनजीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या पावसामुळे नाशिक जागच्या ठप्प झाले. रस्त्यांवर गुढग्याइतके पाणी साचून ते सखल भागाकडे वेगाने वाहिल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर सराफबाजार, हुंडीवाला लेन, शालिमार चौक, पंचवटीतील रामकुंड परिसरातील दुकानांनाही पाण्याने विळखा घातल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी वीज पंपाचा आधार घ्यावा लागला तर नागरिकांना स्वत:च पाणी उपसून बाहेर काढावे लागले. नाशिक महापालिकेची भुयारी गटार योजना रस्त्यातील पाणी वाहून नेण्यास अपयशी ठरल्याची बाबही या निमित्ताने उघडकीस आली. अवघ्या दीड तासात शहरात ९२ मिली मीटर म्हणजेच चार इंच पावसाची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली. शासनाच्या निकषानुसार ६५ मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास त्याची नोंद ‘अतिवृष्टी’ म्हणून केली जाते, अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे निश्चितच हानी होत असल्याचे शासनानेच मान्य केले आहे. परंतु बुधवारच्या पावसामुळे शहरवासीयांचे काहीच नुकसान झाले नसल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आले आहे. शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर त्याबाबत पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना नाशिक तहसीलदारांना देण्यात आल्या, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी ज्या ज्या जागांवर पाणी साचले तेथे जाऊन पाहणी केली, मात्र कोठेही ४८ तास पाणी साचलेले आढळून आले नाही. शासनाने १३ मे २०१५ रोजी अतिवृष्टीने नुकसान झाल्यास त्याच्या नुकसानीची भरपाई कशी द्यायची याबाबत निकष ठरवून दिले असून, त्या निकषामध्ये नाशिक शहरात ९२ मिली मीटर पाऊस झाल्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूद बसत नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली असली तरी, ती शासकीय यंत्रणेने पाहिलेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.