शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. ...

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास तुरळक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहे. मात्र, ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील पूर्णतः धास्तावला असून, मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. वातावरणातील बदलामुळे सातत्याने औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षफळावर हे पाणी साचून काळे डाग पडत असून. यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. द्राक्षामधून वर्षातून एकदाच चांगल्या प्रकारे शेतकरी उत्पादन घेत असतात. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

-----------------

मागील तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, खराब वातावरणामुळे दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देखील बसणार आहे.

- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.