शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. ...

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास तुरळक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहे. मात्र, ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील पूर्णतः धास्तावला असून, मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. वातावरणातील बदलामुळे सातत्याने औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षफळावर हे पाणी साचून काळे डाग पडत असून. यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. द्राक्षामधून वर्षातून एकदाच चांगल्या प्रकारे शेतकरी उत्पादन घेत असतात. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

-----------------

मागील तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, खराब वातावरणामुळे दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देखील बसणार आहे.

- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.