शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: March 30, 2017 22:55 IST

मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

 मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालेगावच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुरुवारचे तपमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.मालेगाव शहर व परिसरात उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाच-सहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तपमानाने तब्बल चाळिशी पार केली आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे तपमान मालेगावचे नोंदवले गेले आहे. याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला आहे. ग्रामीण भागातही दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारच्या सत्रात सूर्य अक्षरश: आग ओकीत असतो. या उन्हामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुपारच्या सत्रात सर्वच प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही उन्हाचा परिणाम दिसून येत आहे. उन्हामुळे शासकीय कार्यालयांमधील गर्दी ओसरली आहे. शहर- परिसरातील शाळा-महाविद्यालयेही सकाळच्या सत्रात भरवली जात आहेत. विद्यार्थ्यांना घराबाहेर सोडण्यास पालक नकार देत आहेत. नागरिकही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतपेय व इतर उपाययोजनांचा आसरा घेतला जात आहे. शहरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रसवंतीगृहे उभारण्यात आली आहेत. शहर परिसरातील झाडांचाही उन्हापासून बचाव करण्यासाठी उपयोग केला जात आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.उन्हामुळे शेतातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. मजूर व शेतकरी उन्हामुळे दुपारच्या सत्रात काम करीत नाहीत. तसेच या कडक उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही घट होत आहे. परिणामी नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातील जनतेला करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ आली आहे. मेंढपाळांनाही मेंढ्यांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर टोपी, उपरणे, गॉगल्स आदि वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)