शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

डझनभर नगरसेवक निवडणूक मैदानातून ‘आउट

By admin | Updated: November 5, 2016 00:43 IST

’सिन्नर : १३ नगरसेवक पुन्हा आजमवणार ‘नशीब’; थेट नगराध्यक्षाच्या आखाड्यात एक विद्यमान नगरसेवक

शैलेश कर्पे ल्ल सिन्नरजिल्ह्यातील सर्वात जुनी पालिका असलेल्या व भव्यदिव्य इमारत असलेल्या सिन्नर नगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून पाय ठेवण्यासाठी तेरा विद्यमान नगरसेवक सरसावले आहेत, तर डझनभर विद्यमान नगरसेवकांनी घरी बसणे पसंत केले आहे. बारा विद्यमान नगरसेवकांना या ना त्या कारणाने निवडणूक रिंगणातून बाहेर राहावे लागले आहे. काही विद्यमान नगरसेवकांनी स्वखुशीने थांबणे पसंत केले आहे तर काहींना आरक्षण अन् प्रभागरचनेचा फटका बसला आहे. काही विद्यमान नगरसेवकांना जनता नाकारेल या धास्तीने नेत्यांनी पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २३ नगरसेवक जनतेतून निवडून आले होते, तर दोन नगरसेवक स्वीकृत होते. त्यामुळे गेल्यावेळी पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या २५ होती. यावेळी प्रभागरचना बदलली असून, १४ प्रभागांतून २८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत, तर तीन नगरसेवक स्वीकृत असणार आहेत. त्यामुळे यावेळी पालिकेच्या सभागृहात ३१ नगरसेवक असणार आहेत. २८ लोकनियुक्त नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेच्या निवडणुकीत यंदा अनेक बदल पाहावयास मिळणार आहेत. प्रभागरचना अन् आरक्षणामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपद भूषविणाऱ्या नगरसेवकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळचे २५ पैकी १२ नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीपासून लांब राहिले आहेत, तर उर्वरित १३ नगरसेवक पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. त्यातील विद्यमान नगरसेवक लता मनोहर हिले यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेस पक्षाकडून त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. विद्यमान नगराध्यक्ष आश्विनी देशमुख व उपनगराध्यक्ष संजय नवसे हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरी पालिका निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. उपनगराध्यक्ष संजय नवसे यांची सून राधिका रोशन नवसे निवडणूक रिंगणात आहेत.सिन्नरचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ आहे. आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनचे आमदार आहेत, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे भाजपाचे नेते आहेत. पक्षांपेक्षा वाजे गट किंवा कोकाटे समर्थक या नावानेच राजकारण तापते. आमदार वाजे यांनी शैलेश नाईक, विजया बर्डे व प्रमोद चोथवे या विद्यमान नगरसेवकांना शिवसेनेच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव लोंढे, नगरसेवक शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, मल्लू पाबळे, बापू गोजरे या सहा विद्यमान नगरसेवकांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे. मेहमूद दारूवाले, लता मुंडे या दोघा विद्यमान नगरसेवकांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक लता हिले या काँग्रेस पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाच्या मैदानात उतरल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. शिवसेनेने २५ नवीन चेहेरे निवडणूक रिंगणात उतरवले आहेत, तर भाजपाने २२ नवीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पालिका निवडणुकीत विद्यमान १३ नगरसेवकांपैकी पुन्हा पालिकेत जाण्यासाठी जनता कोणाला संधी देते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.