शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

..तर भारतीय राष्ट्रवाद फॅसिझमकडे

By admin | Updated: February 15, 2015 22:47 IST

रावसाहेब कसबे : लोणारवाडी येथे छात्रभारतीचा मेळावा

सिन्नर : भारतीय माणसाची भारतीय ही ओळख प्रदेश, भाषा, धर्म, जात, उपजात अशा अनेक गोष्टींमध्ये विखुरली आहे. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि इहवादावर विश्वास असणाऱ्या चळवळींनी जर त्याला भारतीय ओळख दिली नाही, तर भारतीय राष्ट्रवाद फॅसिझमकडे जाण्याची शक्यता आहे, असा इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिली. लोणारवाडी येथील युवामित्र संस्थेत शनिवारी आयोजित छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात वैदू समाजाच्या जात पंचायतीविरुद्ध यशस्वी लढा देणाऱ्या दुर्गा गुडेलू यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर विलास किरोते, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे उपस्थित होते. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरण विशिष्ट वर्गाच्याच हाती राहिल्याने त्यातून थोड्या समाजाचे हितसंबंध जोपासले जात आहेत, यामुळे देशात सर्व क्षेत्रात विषमता वाढत असल्याचे कसबे म्हणाले. या परिस्थितीला रोखण्यासाठी आणि समानतावादी विचार रुजण्यासाठी अधिक तयारी डाव्या चळवळींनी कार्यरत होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ताच्या काळात कोणत्याही स्थानिक घटनेला जागतिक संदर्भ असतात. प्रत्येक घटनेचे विश्लेषण जागतिक संदर्भातच केले पाहिजे, अशा शब्दांत कसबे यांनी कार्यकर्त्यांना आत्मभानाची जाणीव करून दिली. धर्मचिकित्सा टाळून आत्मभान येत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गुडेलू यांनी वयाच्या १३ वर्षी लिहीलेली ‘मुझे कुछ बोलना है, मगर मुझे बोलने की आदत नही...’ ही कविता सादर केली. जातपंचायती विरोधात एकाकी लढा देत असताना त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन ऐकून कार्यकर्तेही हेलावले. जात आणि जात पंचायतीविरोधातल्या लढ्यात कार्यकर्त्यांनी आपल्याला निरंतर साथ देण्याचे आवाहनही गुडेलू यांनी यावेळी केले. दिवसभरात कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. किरोते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप काळे यांनी परिचय करून दिला. श्रीशैल्य बिराजदार यांनी आभार मानले. रविवारी ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा समारोप झाला. (वार्ताहर)