शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रमाणपत्रासाठी अध्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:06 IST

नाशिक : राखीव जागांवरून निवडणूक लढविणारे परंतु मुदतीत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारा शासकीय अध्यादेश शासनाने जारी केला असून, यापुढे जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांऐवजी बारा महिने मुदत देण्यात आली असली तरी, ज्यांना गेल्या वर्षभराच्या काळात जात वैधता प्रमाणपत्र मिळाले परंतु त्यांनी अद्यापही निवडणूक अधिकाºयांकडे सादर केले नाही, त्यांना शासनाने पंधरा दिवसांची मुदत दिली आहे, या मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाºयांच्या पदावर मात्र गंडांतर कायम राहणार आहे.

ठळक मुद्देपंधरा दिवसांची मुदत : वर्षापूर्वीच्या सदस्यांना धोका कायम

नाशिक : राखीव जागांवरून निवडणूक लढविणारे परंतु मुदतीत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारा शासकीय अध्यादेश शासनाने जारी केला असून, यापुढे जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांऐवजी बारा महिने मुदत देण्यात आली असली तरी, ज्यांना गेल्या वर्षभराच्या काळात जात वैधता प्रमाणपत्र मिळाले परंतु त्यांनी अद्यापही निवडणूक अधिकाºयांकडे सादर केले नाही, त्यांना शासनाने पंधरा दिवसांची मुदत दिली आहे, या मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाºयांच्या पदावर मात्र गंडांतर कायम राहणार आहे.गेल्या महिन्यांपूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºयांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न निर्माण झाला होता. राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे.या संदर्भातील शासन अध्यादेश ११ आॅक्टोबर रोजी जारी करण्यात आला असून, त्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा ऐवजी बारा महिने मुदत देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सदरचा अध्यादेश जारी करण्याच्या दिनांकापूर्वी जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र दिले असेल, परंतु लोकप्रतिनिधीने ते निवडणूक अधिकाºयाकडे सादर केलेले नसेल अशांनी ते पंधरा दिवसाच्या आत सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. जे लोकप्रतिनिधी पंधरा दिवसांत सादर करणार नाहीत, त्यांचे सदस्यत्व रद्द ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी, एक वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यांच्यासाठीच हा दिलासा असून, ज्यांना निवडून येऊन एका वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला परंतु त्यांनी अद्यापही प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. जिल्ह्यातील तीन हजार लोकप्रतिनिधींना दिलासासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व धोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने जात वैधता पडताडणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिन्यांऐवजी बारा महिने करण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतची घोषणा केल्याने हजारो लोकप्रतिनिधींना त्याचा दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्णात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका अशा सुमारे तीन हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना हायसे वाटले.