शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
2
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
3
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
4
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
5
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
6
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
7
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
8
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
9
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
10
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
11
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
12
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
13
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
15
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
16
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
17
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
19
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
20
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:18 IST

मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक : मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  आगामी वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही असून, निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढलेली असताना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आयोगाचे आदेश असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाही. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाहीत. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत. यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक असताना पाठपुरावा करूनही अनेक मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट झालेली नसल्याने असे नागरिक त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीतही नाशिक जिल्ह्यात या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.ग्रामीण भागाकडे दुर्लक्षजिल्ह्यात ३४ लाख १५ हजार ५८० मतदार असून, मोहीम मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी ४ लाख २ हजार १४४ मतदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. मोहीम सुरू झाल्यानंतर ११ लाख २१ हजार ६५८ मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ जूनपर्यंत ५ लाख ३६ हजार ९८५ मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, एकूण मतदार संख्येच्या ४७.८७ टक्केच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदारांची माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही मतदार यादीत नावाचा समावेश व माहितीची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक