शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:18 IST

मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक : मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  आगामी वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही असून, निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढलेली असताना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आयोगाचे आदेश असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाही. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाहीत. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत. यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक असताना पाठपुरावा करूनही अनेक मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट झालेली नसल्याने असे नागरिक त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीतही नाशिक जिल्ह्यात या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.ग्रामीण भागाकडे दुर्लक्षजिल्ह्यात ३४ लाख १५ हजार ५८० मतदार असून, मोहीम मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी ४ लाख २ हजार १४४ मतदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. मोहीम सुरू झाल्यानंतर ११ लाख २१ हजार ६५८ मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ जूनपर्यंत ५ लाख ३६ हजार ९८५ मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, एकूण मतदार संख्येच्या ४७.८७ टक्केच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदारांची माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही मतदार यादीत नावाचा समावेश व माहितीची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक