शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:18 IST

मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक : मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  आगामी वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही असून, निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढलेली असताना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आयोगाचे आदेश असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाही. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाहीत. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत. यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक असताना पाठपुरावा करूनही अनेक मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट झालेली नसल्याने असे नागरिक त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीतही नाशिक जिल्ह्यात या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.ग्रामीण भागाकडे दुर्लक्षजिल्ह्यात ३४ लाख १५ हजार ५८० मतदार असून, मोहीम मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी ४ लाख २ हजार १४४ मतदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. मोहीम सुरू झाल्यानंतर ११ लाख २१ हजार ६५८ मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ जूनपर्यंत ५ लाख ३६ हजार ९८५ मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, एकूण मतदार संख्येच्या ४७.८७ टक्केच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदारांची माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही मतदार यादीत नावाचा समावेश व माहितीची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक