शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:22 IST

सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले.

ठळक मुद्देआॅक्टोंबरच्या भरपाईची प्रतिक्षा : १२५ मिली मीटर पावसाची नोंद अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले

नाशिक : ओखी चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानामुळे हवेत गारवा वाढून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, आठ तासात सुमारे १२५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे द्राक्षबागांसह भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. आॅक्टोंबर महिन्यात अशाच प्रकारे वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची अद्यापही शेतक-यांना भरपाई मिळालेली नसताना त्यात पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळी वा-यासह सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. आॅक्टोंबरच्या अवकाळी पावसापासून कसेबसे बचावलेल्या द्राक्ष बागांवर संकट कोसळले. पावसामुळे द्राक्षांचे घडे तुटून पडले तर काहीं बागांमध्ये मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. द्राक्षबागेत पावसाचे पाणी साचल्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर विक्रीसाठी काढून ठेवलेला मका तसेच उघड्यावरील लाल कांदाही पावसाच्या पाण्यात भिजून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजीपाला व शेतातील गहू, हरभरा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ हवामान व पावसाची हजेरी कायम होती त्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. नागरिकांनी घराबाहेर पडण्यास नापसंती व्यक्त केली तर नोकरदारांचीही धावपळ उडाली.गेल्या दोन महिन्यात अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावून नुकसान केल्यामुळे मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तलाठी, मंडल अधिकारी, कृषी विभागाला शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसात पंचनामे पुर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतरच ख-या अर्थाने नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे. आॅक्टोंबर महिन्यात अशाच प्रकारे दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने सुमारे साडेसहाशे गावातील ५० हजार शेतक-यांचे नुकसान झाले असून, त्याचा अहवाल गेल्या आठवड्यातच कृषी खात्याकडून सादर करण्यात आला आहे. या नुकसानीची अद्याप शेतक-यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यात भर पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा व मक्याला चांगला भाव मिळू लागलेला असताना तसेच द्राक्ष काढणीवर आलेले असताना अस्मानी संकट कोसळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक