शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

रानवड कारखान्याची थकबाकी देण्याचे आदेश

By admin | Updated: September 15, 2015 23:04 IST

संभाजी राजे उद्योग समूहाला न्यायालयाचा दणका

निफाड : रानवड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतलेल्या छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगसमूहाने कारखान्याचे ३० आॅगस्ट २०१५ पर्यंतचे ५ कोटी ८३ लाख रुपयांचे थकीत भाडे एका महिन्याच्या आत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगसमूहाचे विठ्ठलराव उंबरवाडीकर यांना दिल्याची माहिती रासाका कामगार युनियनचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे. तीन वर्षांपासून रानवड साखर कारखाना संभाजी राजे उद्योगसमूहाने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे; मात्र कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने कोणतेही नियम पाळले नाहीत.या कारखान्याचे अवसायक व कामगारांनी कारखान्याचे थकीत भाडे व पगाराची थकीत रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात उद्योगसमूहाने कारखान्याची थकबाकी द्यावी,असा निकालही न्यायालयाने दिला होता. संभाजी राजे उद्योगसमूहाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर उद्योगसमूहाने कारखान्याचे थकीत भाडे एका महिन्यात द्यावे व त्यानंतर अपील दाखल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.संभाजी राजे उद्योगसमूहाने रासकचे भाड्यापोटी ७ कोटी ५० लाख रुपये थकविले आहे, तर हंगामी कामगारांचा बैठा भत्ता एक कोटी ५० लाख व कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे ९० लाख रुपये तसेच कायम कामगार पतसंस्था व हंगामी कायम कामगार पतसंस्था यांचे एकत्रित ५० लाख अशी सर्व रक्कम या उद्योगसमूहाने कामगारांच्या वेतनातून कपात केली आहे; मात्र ही रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली नाही. तसेच ५ महिन्यांपासून कामगारांचे पगारही थकविले असून, उपदान (ग्रॅज्युटी) ६७ लाख असे एकूण १३ कोटी ५० लाख रुपये या उद्योगसमूहाकडे थकीत आहे. यापैकी भाड्यापोटी कारखान्याचे ३० आॅगस्ट २०१५ पर्यंतचे ५ कोटी ८३ लाख रुपये त्वरित देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उद्योगसमूहाला चांगलीच चपराक बसली आहे. (वार्ताहर)