शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शाळा डिजिटल करण्याचे आदेश

By admin | Updated: July 13, 2017 23:51 IST

दादा भुसे : २६ जानेवारीची डेडलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील ३३०० प्राथमिक शाळा येत्या २६ जानेवारी २०१८ अखेर शंभर टक्के डिजिटल झाल्या पाहिजेत. त्यात कोणतीही हयगय ऐकली जाणार नाही, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. तसेच विद्यार्थी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.जिल्हा परिषदेत दादा भुसे यांनी आढावा बैठकीत तीन वर्षांतील जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती घेतली. प्राथमिक शिक्षण विभागाच्या आढाव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी दीड कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून आदिवासी भागातील शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा असून, ७५ शाळा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून डिजिटल करण्यात आल्या असून, ५८ शाळा सामाजिक दायित्वातून डिजिटल करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. त्या शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या पाहिजेत, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. बिगर आदिवासी भागासाठी ५० लाखांचा निधी आला असून, त्यातून तसेच आदिवासी भागासाठी प्राप्त असलेल्या दीड कोटींच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या उर्वरित दोन हजार शाळा डिजिटल केल्या जातील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा येत्या २६ जानेवारी अखेर डिजिटल झाल्या पाहिजेत, असे दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले.अपघाती योजनेचे प्रस्ताव प्रलंबितविद्यार्थी अपघात योजनेचे प्रस्ताव दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याचा जाब दादा भुसे यांनी प्रवीण अहिरे यांना विचारला. आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव १० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे तर भास्कर गावित यांनी एक प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप केला. हे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याचे भुसे यांनी आदेश दिले.जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा असून, ७५ शाळा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून डिजिटल करण्यात आल्या असून, ५८ शाळा सामाजिक दायित्वातून डिजिटल करण्यात आल्या आहेत.सभापती जमिनीवरशिक्षण व सभापती यतिन पगार व्यासपीठावर बसण्याऐवजी राज्यमंत्र्यांच्या समोरील खुर्चीवर स्थानापन्न झाले. त्यांनी शाळा निर्लेखनाच्या प्रस्तावांना जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच जिल्हा क्रीडा कार्यालया कडील ग्रामीण भागात वाटप करण्यात येणारे क्रीडा साहित्य यांची चौकशी होण्याची मागणी केली.