शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

तीन हजार शाळा डिजिटल करण्याचे आदेश

By admin | Updated: July 13, 2017 23:51 IST

दादा भुसे : २६ जानेवारीची डेडलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील ३३०० प्राथमिक शाळा येत्या २६ जानेवारी २०१८ अखेर शंभर टक्के डिजिटल झाल्या पाहिजेत. त्यात कोणतीही हयगय ऐकली जाणार नाही, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. तसेच विद्यार्थी अपघात विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.जिल्हा परिषदेत दादा भुसे यांनी आढावा बैठकीत तीन वर्षांतील जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती घेतली. प्राथमिक शिक्षण विभागाच्या आढाव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी दीड कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून आदिवासी भागातील शाळा डिजिटल करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा असून, ७५ शाळा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून डिजिटल करण्यात आल्या असून, ५८ शाळा सामाजिक दायित्वातून डिजिटल करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. त्या शाळा शंभर टक्के डिजिटल झाल्या पाहिजेत, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. बिगर आदिवासी भागासाठी ५० लाखांचा निधी आला असून, त्यातून तसेच आदिवासी भागासाठी प्राप्त असलेल्या दीड कोटींच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या उर्वरित दोन हजार शाळा डिजिटल केल्या जातील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा येत्या २६ जानेवारी अखेर डिजिटल झाल्या पाहिजेत, असे दादा भुसे यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले.अपघाती योजनेचे प्रस्ताव प्रलंबितविद्यार्थी अपघात योजनेचे प्रस्ताव दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याचा जाब दादा भुसे यांनी प्रवीण अहिरे यांना विचारला. आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव १० वर्षांपासून प्रलंबित असल्याचे तर भास्कर गावित यांनी एक प्रस्ताव चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप केला. हे प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याचे भुसे यांनी आदेश दिले.जिल्हा परिषदेच्या ३३३१ प्राथमिक शाळा असून, ७५ शाळा जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून डिजिटल करण्यात आल्या असून, ५८ शाळा सामाजिक दायित्वातून डिजिटल करण्यात आल्या आहेत.सभापती जमिनीवरशिक्षण व सभापती यतिन पगार व्यासपीठावर बसण्याऐवजी राज्यमंत्र्यांच्या समोरील खुर्चीवर स्थानापन्न झाले. त्यांनी शाळा निर्लेखनाच्या प्रस्तावांना जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप केला. तसेच जिल्हा क्रीडा कार्यालया कडील ग्रामीण भागात वाटप करण्यात येणारे क्रीडा साहित्य यांची चौकशी होण्याची मागणी केली.