शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:37 IST

नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणात असलेले पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.

पाणीटंचाई : माणिकपुंज धरणाची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणात असलेले पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गिरणा धरण मर्यादित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. माणिकपुंज धरण जेमतेम ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढचा पाऊस येईपर्यंत माणिकपुंज या एकमेव धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.प्रशासकीय पातळीवर या बाबींची दखल घेऊन, माणिकपुंज धरणाला प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी गुरुवारी भेट देऊन धरणात असलेले विजेचे शेतीपंप बंद करण्याच्या सूचना दिल्या; मात्र त्यावर शेतकºयांचा आम्ही पंप बंद करू; परंतु नदीतून पाणी सोडले जाणार असेल तर ते सहन करणार नाही, असा सूर उमटल्याने, माणिकपुंजचे पाणी हा वादाचा विषय होऊ नये. त्याकडे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून बघावे, अशी सामंजस्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तालुक्यात पृष्ठभागावरचे पाणी स्रोत आटले आहेत. विहिरींनी आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. पृष्ठभागावर पाणी असलेला व भौगोलिकदृष्ट्या सोयीचा असलेला एकमेव स्रोत माणिकपुंज आहे. तालुक्यात जूनमध्ये पाऊस पडतोच असे नाही. नाग्यासाक्या धरणाच्या पाण्याने दगा दिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. गिरणा धरणाचे पाणी अल्पावधीत सगळीकडे उपलब्ध करून देणे कठीण आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, असाच सूर आहे.नाग्यासाक्या धरणात मृत पाणीच शिल्लक आहे. कासारीच्या दोन धरणात पाणी आहे. याशिवाय तालुक्यात इतरत्र पाणीसाठे नाहीत. माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा करू नये. तसेच चोरून वीज घेणाºयांवर कडक कारवाई करावी.- भीमराज दराडे, प्रांताधिकारी