शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
3
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
4
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
5
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
6
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
7
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
8
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
9
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
10
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
11
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
12
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
13
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
14
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
15
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
16
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
17
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
18
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
19
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
20
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 22:37 IST

नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणात असलेले पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.

पाणीटंचाई : माणिकपुंज धरणाची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी

नांदगाव : न भूतो.. अशा मोठ्या दुष्काळाला नजीकच्या काळात सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माणिकपुंज धरणातले पाणी बिनदिक्कत शेतीसाठी उपसले जात आहे. हे तत्काळ रोखले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने धरणात असलेले पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गिरणा धरण मर्यादित गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे. माणिकपुंज धरण जेमतेम ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढचा पाऊस येईपर्यंत माणिकपुंज या एकमेव धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.प्रशासकीय पातळीवर या बाबींची दखल घेऊन, माणिकपुंज धरणाला प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी गुरुवारी भेट देऊन धरणात असलेले विजेचे शेतीपंप बंद करण्याच्या सूचना दिल्या; मात्र त्यावर शेतकºयांचा आम्ही पंप बंद करू; परंतु नदीतून पाणी सोडले जाणार असेल तर ते सहन करणार नाही, असा सूर उमटल्याने, माणिकपुंजचे पाणी हा वादाचा विषय होऊ नये. त्याकडे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून बघावे, अशी सामंजस्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तालुक्यात पृष्ठभागावरचे पाणी स्रोत आटले आहेत. विहिरींनी आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. पृष्ठभागावर पाणी असलेला व भौगोलिकदृष्ट्या सोयीचा असलेला एकमेव स्रोत माणिकपुंज आहे. तालुक्यात जूनमध्ये पाऊस पडतोच असे नाही. नाग्यासाक्या धरणाच्या पाण्याने दगा दिला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. गिरणा धरणाचे पाणी अल्पावधीत सगळीकडे उपलब्ध करून देणे कठीण आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, असाच सूर आहे.नाग्यासाक्या धरणात मृत पाणीच शिल्लक आहे. कासारीच्या दोन धरणात पाणी आहे. याशिवाय तालुक्यात इतरत्र पाणीसाठे नाहीत. माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा करू नये. तसेच चोरून वीज घेणाºयांवर कडक कारवाई करावी.- भीमराज दराडे, प्रांताधिकारी