शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.या मेळाव्यात मानूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, शांताराम जाधव, सखाराम वाघ, मोहन जाधव, अण्णा शेवाळे, बाजीराव गुंजाळ, प्रवीण रौंदळ, दादाजी बोरसे यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. दरम्यान, रक्त सांडावे लागले तरी चालेल पण परिसरातील एकही शेतकरी आपल्या शेतातून सटाणा शहरासाठी जाणारी पाइपलाइन खोदू देणार नाही, अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली. जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुनंद सुळे कालवा संघर्ष कृती समितीचे गठन करण्यात आले. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जलवाहिनीस परिसरातील सर्व गावांचा व शेतकºयांचा विरोध असून, स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा दर्शविण्यात आला. सटाणा शहरवासीयांचा नैसर्गिक हक्क हा केळझर धरणावर असून, त्यांना कळवण तालुक्यातील धरणातील पाणी हे पाइपलाइनद्वारे कदापिही जाऊ दिले जाणारनाही. यासाठी शेतकरी शेतात पाइपलाइन खोदू देणार नाहीत. जर शासनाला सटाणा शहरवासीयांना पाणी द्यायचे असल्यास ते कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे, अशी भूमिका शेतकºयांनी मांडली आहे. अन्यथा आज या आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला आहे. याविरोधात आंदोलना स शेतकºयांनी तयार रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. यावेळी पुनद डावा कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकºयांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव ,शांताराम जाधव,आण्णा शेवाळे यांनी या लढाची पुढील आखणी केली असून येत्या १५ आॅगस्ट ला या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामपंचायत ,सोसायटी व विविध संघटनांचे ठराव केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व शासनदरबारी याचा पाठपुरावा करण्यासाठी पुनद दावा कालवा संघर्ष समतिी गठन करून मोहन जाधव , सखाराम वाघ ,कारभारी पवार ,बाजीराव गुंजाळ , प्रल्हाद गुंजाळ रवींद्र गुंजाळ, दीपक गुंजाळ, हेमंत गुंजाळ ,या तरु ण शेतकº्यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.