शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

गावठाण विकासाच्या कामाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:55 IST

स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देशाहू खैरे यांचे पत्र। स्मार्ट सिटी-मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी

नाशिक : स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पॉइंट वंदे मातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक आणि कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पत्र दिले आहे. अर्थात, स्मार्ट सिटी कंपनीने सदरचे काम अवघे दोन महिन्यांत पूर्ण करून परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांना दिलासा देण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.स्मार्ट सिटीची कामे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा स्मार्टरोड गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गाजत आहे. अवघा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला आणि खर्चदेखील सतरा कोटींच्या वर गेला आहे. त्यानंतरदेखील अपेक्षित काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर गेल्यावर्षी मध्येच कंपनीने गावठाण विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्यात रस्त्याची विकासकामे सुरू झाली असून, आता वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीने नियोजन केल्यानंतर पोलीस यंत्रणेनेदेखील अधिसूचना जारी केली आहे. तथापि, आता या कामविषयी शंका व्यक्त केली जात असतानाच आता हे काम तातडीने थांबविण्याची मागणी कंपनीचे संचालक असलेल्या शाहू खैरे यांनी केली आहे.स्मार्ट सिटीतील अभियंत्यांना मुळातच या भागातील गटारींची माहिती नाही. तसेच महापालिकेच्या अभियंत्याचा आणि कंपनीच्या अभियंत्याचा समन्वय नाही. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मुळातच या मार्गाच्या खालून अनेक नाले जात आहेत. भद्रकाली पंपिंग स्टेशन येथील काही नाले याच भागातून पुढे सरस्वती नाल्याला मिळतात आणि पुढेही अनेक नाले मिळतात. आता पावसाळा सुरू असताना अशाप्रकारचे काम सुरू केल्यानंतर पाणी साचून अनेक दुकानदार आणि नागरिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे काम सुरू करू नये, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.शहरात मेनरोडसारख्या भागात पाणी साचत असल्याने स्मार्ट सिटी कंपनीने गटारीचे काम हाती घेतले. मात्र काम सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काम बंद झाले. बाजारपेठेतूनच विरोध होत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आल्यामुळे व्यापारी बुचकळ्यात पडले आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अलीकडेच या भागाची पाहणी करून या भागात पाणी साचत असल्याने तातडीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या समन्वयातूनच हे काम होत आहे.- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी