शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सेवांच्या निकषावरही आक्षेप

By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST

कृपाशीर्वाद : नियमात नसतानाही गाड्यांचे लाभ; ‘एनपीए’ अलाउन्स अजूनही सुरूच

संदीप भालेराव ल्ल नाशिकविद्यापीठ नियमनात वित्त व लेखा अधिकारी, तसेच विद्यार्थी कल्याण विभाग अधिकाऱ्यांना वाहन व्यवस्था कशी पुरविण्यात आली, याबाबतची विचारणाही आॅडिट समितीने केली असल्याचे बोलले जात आहे. अशी व्यवस्था देताना त्याबाबतचा ठराव व्यवस्थापन परिषदेत केला आहे काय, याचीदेखील चाचपणी करण्यात आल्याचे समजते. शासनाने केवळ कुलगुरूंसाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे. परंतु आरोग्य विद्यापीठाने वित्त व लेखा अधिकारी, तसेच विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना-देखील वाहन व्यवस्था पुरविली आहे. अशी व्यवस्था कोणत्या अ‍ॅक्टनुसार केली, अशी विचारणा समितीने केल्याचे समजते. विशेष म्हणजे याबाबतचा कोणताही ठराव व्यवस्थापन परिषदेवर झाला नसल्याची बाब समितीने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आगामी काळात याबाबतचा खुलासा विद्यापीठाला करावा लागू शकतो. तत्कालीन म्हणजेच विद्यापीठाचे पहिले कुलसचिव दुर्गावळे यांनी व्यवस्थापन परिषदेची परवानगी घेऊन वाहन वापरला सुरुवात केली होती. याचा अर्थ ती तशीच सुविधा आताच्याही कुलसचिवांना आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विद्यापीठाने वाहन सुविधा पुरविल्यामुळे या अधिकाऱ्यांकडून वाहनांचा पुरेपूर वापर सुरू आहे. संबंधित अधिकारी हे दुपारच्या जेवणासाठी याच वाहनाने घरी जात असतात. म्हणजे केवळ घरी जाण्यायेण्यासाठी त्यांच्या वाहनांचा वापर होत आहे. त्यावर विद्यापीठाचा दरवर्षी लाखोंचा खर्च होत आहे. एका उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला ‘एनपीए’ (नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स) दिला जात असल्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. उपकुलसचिवपद हे प्रशासकीय पद असताना त्यावर डॉक्टरची त्यावर नियुक्ती करून विद्यापीठाने त्यास ‘एनपीए’ का सुरू केला याचीही विचारणा आॅडिट समितीने केला आहे. याशिवाय गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठाने वित्त अधिकारी का नियुक्त केला नाही, असा सवाल उपस्थित करण्याबरोबरच सध्या ज्या अधिकाऱ्याकडे वित्त अधिकारी म्हणून पदभार आहे तेदेखील अपात्र असल्याचा ठपका या समितीने ठेवला असल्याचे समजते. वित्त अधिकारी म्हणून झालेली नेमणूक व त्यास दिलेली वेतनश्रेणी संदर्भातील आक्षेपार्ह कागदपत्रेदेखील समितीने ताब्यात घेतली असल्याचे कळते. विद्यापीठातील काही क्लेरीकल पदांबाबतचे वाद अनेक वर्षांपासूनचे आहेत. येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्याच सहकारी कर्मचाऱ्याच्या पात्रतेविषयी राजभवन, वैद्यकीय विभाग तसेच न्यायालयात तक्रारी केलेल्या आहेत. या पदांवरील कर्मचाऱ्यांची कागदपत्रेदेखील समितीच्या ताब्यात आली आहेत. त्यामुळे आगामी काळात यातील अनेक गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी विद्यापीठात विद्यार्थीर् कल्याण विभागात असलेल्या अधिकाऱ्यास परीक्षा नियंत्रक आणि नंतर थेट कुलसचिवच केल्याने विद्यापीठातीलच काही अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर एवढी मर्जी कशासाठी, अशी विचारणा केली होती. तीन वर्षांत तीन मोठी पदे कोणाच्या आशीर्वादाने मिळाली याविषयीचे प्रकरण अद्यापही सुरूच आहे. हाही मुद्दा समितीने नोंदला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणी कुलगुरुंनी येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर खापर फोडले आहे. त्यांनीच आॅडिट समितीला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत स्वत:चा बचाव केला आहे.(समाप्त)