शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

वाहन सेवांच्या निकषावरही आक्षेप

By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST

कृपाशीर्वाद : नियमात नसतानाही गाड्यांचे लाभ; ‘एनपीए’ अलाउन्स अजूनही सुरूच

संदीप भालेराव ल्ल नाशिकविद्यापीठ नियमनात वित्त व लेखा अधिकारी, तसेच विद्यार्थी कल्याण विभाग अधिकाऱ्यांना वाहन व्यवस्था कशी पुरविण्यात आली, याबाबतची विचारणाही आॅडिट समितीने केली असल्याचे बोलले जात आहे. अशी व्यवस्था देताना त्याबाबतचा ठराव व्यवस्थापन परिषदेत केला आहे काय, याचीदेखील चाचपणी करण्यात आल्याचे समजते. शासनाने केवळ कुलगुरूंसाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे. परंतु आरोग्य विद्यापीठाने वित्त व लेखा अधिकारी, तसेच विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना-देखील वाहन व्यवस्था पुरविली आहे. अशी व्यवस्था कोणत्या अ‍ॅक्टनुसार केली, अशी विचारणा समितीने केल्याचे समजते. विशेष म्हणजे याबाबतचा कोणताही ठराव व्यवस्थापन परिषदेवर झाला नसल्याची बाब समितीने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आगामी काळात याबाबतचा खुलासा विद्यापीठाला करावा लागू शकतो. तत्कालीन म्हणजेच विद्यापीठाचे पहिले कुलसचिव दुर्गावळे यांनी व्यवस्थापन परिषदेची परवानगी घेऊन वाहन वापरला सुरुवात केली होती. याचा अर्थ ती तशीच सुविधा आताच्याही कुलसचिवांना आहे का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विद्यापीठाने वाहन सुविधा पुरविल्यामुळे या अधिकाऱ्यांकडून वाहनांचा पुरेपूर वापर सुरू आहे. संबंधित अधिकारी हे दुपारच्या जेवणासाठी याच वाहनाने घरी जात असतात. म्हणजे केवळ घरी जाण्यायेण्यासाठी त्यांच्या वाहनांचा वापर होत आहे. त्यावर विद्यापीठाचा दरवर्षी लाखोंचा खर्च होत आहे. एका उपकुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला ‘एनपीए’ (नॉन प्रॅक्टीस अलाऊन्स) दिला जात असल्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. उपकुलसचिवपद हे प्रशासकीय पद असताना त्यावर डॉक्टरची त्यावर नियुक्ती करून विद्यापीठाने त्यास ‘एनपीए’ का सुरू केला याचीही विचारणा आॅडिट समितीने केला आहे. याशिवाय गेल्या चार वर्षांपासून विद्यापीठाने वित्त अधिकारी का नियुक्त केला नाही, असा सवाल उपस्थित करण्याबरोबरच सध्या ज्या अधिकाऱ्याकडे वित्त अधिकारी म्हणून पदभार आहे तेदेखील अपात्र असल्याचा ठपका या समितीने ठेवला असल्याचे समजते. वित्त अधिकारी म्हणून झालेली नेमणूक व त्यास दिलेली वेतनश्रेणी संदर्भातील आक्षेपार्ह कागदपत्रेदेखील समितीने ताब्यात घेतली असल्याचे कळते. विद्यापीठातील काही क्लेरीकल पदांबाबतचे वाद अनेक वर्षांपासूनचे आहेत. येथील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्याच सहकारी कर्मचाऱ्याच्या पात्रतेविषयी राजभवन, वैद्यकीय विभाग तसेच न्यायालयात तक्रारी केलेल्या आहेत. या पदांवरील कर्मचाऱ्यांची कागदपत्रेदेखील समितीच्या ताब्यात आली आहेत. त्यामुळे आगामी काळात यातील अनेक गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे. यापूर्वी विद्यापीठात विद्यार्थीर् कल्याण विभागात असलेल्या अधिकाऱ्यास परीक्षा नियंत्रक आणि नंतर थेट कुलसचिवच केल्याने विद्यापीठातीलच काही अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर एवढी मर्जी कशासाठी, अशी विचारणा केली होती. तीन वर्षांत तीन मोठी पदे कोणाच्या आशीर्वादाने मिळाली याविषयीचे प्रकरण अद्यापही सुरूच आहे. हाही मुद्दा समितीने नोंदला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणी कुलगुरुंनी येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर खापर फोडले आहे. त्यांनीच आॅडिट समितीला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत स्वत:चा बचाव केला आहे.(समाप्त)