शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

विरोधकांकडूनच दाभाडीला पाणी देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:19 IST

दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आझादनगर : दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गत महासभेत दाभाडी गावास पाणी देण्यास मनपाच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. याबाबत माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व बुलंद एकबाल यांनी मंगळवारी (२५) पत्रकार परिषद घेवून विरोध दर्शवित ‘त्या’ ठरावास विखंडित करण्याची लेखी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात येवून या निर्णयास शहराच्या विरोधात असल्याचे आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेचा सहउदाहरण आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. आज दुपारी महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती देत ठरावाची प्रत पत्रकारांना दिली. महापौर शेख म्हणाले की, आजचे विरोधक काल सत्तेत असताना ७ मार्च २०१७ रोजी ठराव क्र. १८४ नुसार यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. आज समाजाचा पुळका दाखविणारे तेव्हा झोपा काढत होते का? असा सवाल केला. शहरातील मुस्लिम समाजाचे सहानुभूती दाखविणाºयांनी प्रथम आत्मपरिक्षण करावे. माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्या आमदार पदाचा कार्यकाळात शहरात चणकापूर धरणातून येणाºया पाण्याचे एका आवर्तनास मुकावे लागले आहे. दिवंगत नेते निहाल अहमद यांनी सात वेळा निवडून येत मंत्री, विरोधी पक्षनेते अशी महत्वाची पदे भूषविली. तेव्हा शहरास व मुस्लिम समाजासाठी स्मरणात राहणारे एक तरी काम केले आहे का? असा सवाल त्यांनी केला. याउलट माझ्या आमदाराच्या कार्यकाळातच गिरणाधरण पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास आली. त्यास दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व दौलतराव आहेर यांनी विरोधी पक्षात राहून मोठे सहकार्य केले होते. आज निहाल अहमद यांचे चिरंजीव, जावई व माजी आमदार विरोध करीत आहेत. त्यांना तसा नैतिक अधिकार नाही. शहरात हद्दवाढीत विकासासाठी १४.५ कोटी रूपये शासनाने दिले होते. त्यापैकी १०.५ कोटी रूपये फक्त हिंदू बहुल भागातील हद्दवाढीच्या विकासासाठी वापरण्यात आले. तेव्हा कुठे होते समाजहित? असा टोला त्यांनी लगावला.अन्सारी यांची बदली सुडभावनेतून नाहीमालेगाव शहर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जहीर अन्सारी यांची सुडभावनेतून बदली करण्यात आलेली नाही. विकास कामात खोडा घालणाºयांनी भेदभाव करू नये. भेदभावाचे बिजे पेरणारे कोण आहेत हे सर्वश्रुत आहेत. जहीर अन्सारी यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मनपास आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृतरित्या नळजोडण्या करुन घेतल्या. याचा फटका बसल्याने महापालिकेस नळपट्टीच्या माध्यमातून मिळणाºया उत्पन्नास मुकावे लागत असल्याचे महापौर रशीद शेख यांनी सांगितले.