शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

विरोधकांकडूनच दाभाडीला पाणी देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:19 IST

दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आझादनगर : दाभाडीला मालेगाव मनपाच्या तळवाडे साठवण तलावातून पाणी देण्यास विरोध करणाºयांनीच सत्तेत असताना मार्चमध्ये तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार पाणी देण्याबाबत महासभेत ठराव मंजूर केला होता, अशी माहिती महापौर शेख रशीद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गत महासभेत दाभाडी गावास पाणी देण्यास मनपाच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. याबाबत माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व बुलंद एकबाल यांनी मंगळवारी (२५) पत्रकार परिषद घेवून विरोध दर्शवित ‘त्या’ ठरावास विखंडित करण्याची लेखी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात येवून या निर्णयास शहराच्या विरोधात असल्याचे आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज महापौर रशीद शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेचा सहउदाहरण आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. आज दुपारी महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती देत ठरावाची प्रत पत्रकारांना दिली. महापौर शेख म्हणाले की, आजचे विरोधक काल सत्तेत असताना ७ मार्च २०१७ रोजी ठराव क्र. १८४ नुसार यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. आज समाजाचा पुळका दाखविणारे तेव्हा झोपा काढत होते का? असा सवाल केला. शहरातील मुस्लिम समाजाचे सहानुभूती दाखविणाºयांनी प्रथम आत्मपरिक्षण करावे. माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल यांच्या आमदार पदाचा कार्यकाळात शहरात चणकापूर धरणातून येणाºया पाण्याचे एका आवर्तनास मुकावे लागले आहे. दिवंगत नेते निहाल अहमद यांनी सात वेळा निवडून येत मंत्री, विरोधी पक्षनेते अशी महत्वाची पदे भूषविली. तेव्हा शहरास व मुस्लिम समाजासाठी स्मरणात राहणारे एक तरी काम केले आहे का? असा सवाल त्यांनी केला. याउलट माझ्या आमदाराच्या कार्यकाळातच गिरणाधरण पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास आली. त्यास दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे व दौलतराव आहेर यांनी विरोधी पक्षात राहून मोठे सहकार्य केले होते. आज निहाल अहमद यांचे चिरंजीव, जावई व माजी आमदार विरोध करीत आहेत. त्यांना तसा नैतिक अधिकार नाही. शहरात हद्दवाढीत विकासासाठी १४.५ कोटी रूपये शासनाने दिले होते. त्यापैकी १०.५ कोटी रूपये फक्त हिंदू बहुल भागातील हद्दवाढीच्या विकासासाठी वापरण्यात आले. तेव्हा कुठे होते समाजहित? असा टोला त्यांनी लगावला.अन्सारी यांची बदली सुडभावनेतून नाहीमालेगाव शहर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जहीर अन्सारी यांची सुडभावनेतून बदली करण्यात आलेली नाही. विकास कामात खोडा घालणाºयांनी भेदभाव करू नये. भेदभावाचे बिजे पेरणारे कोण आहेत हे सर्वश्रुत आहेत. जहीर अन्सारी यांच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मनपास आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृतरित्या नळजोडण्या करुन घेतल्या. याचा फटका बसल्याने महापालिकेस नळपट्टीच्या माध्यमातून मिळणाºया उत्पन्नास मुकावे लागत असल्याचे महापौर रशीद शेख यांनी सांगितले.