शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नाशिकच्या प्रसिद्ध द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:04 IST

नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देहवी राजकीय इच्छाशक्ती : दार्जिलिंग चहाच्या धर्तीवर होईल आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड

अझहर शेख। लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकचे द्राक्षे जगप्रसिद्ध जरी असले तरी आंतरराष्टÑीय बाजारपेठ द्राक्षांसाठी सध्या मर्यादित स्वरूपाची आहे. २०१०-११ साली येथील द्राक्षांना भौगोलिक मूल्य व गुणवत्तेसाठी ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षांना स्थान मिळाले; मात्र ही बाजारपेठ अधिकाधिक व्यापक करण्यासाठी आता नाशिकच्या द्राक्षांना ‘पीजीआय’ मानांकनाची गरज आहे. यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांस राजकीय पुढाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.नाशिकमधील द्राक्षांचे उत्पादन मोठे आहे. भारताची द्राक्ष राजधानी म्हणूनही नाशिकचा नावलौकिक आहे. नाशिकच्या द्राक्षांना भौगोलिक मानांकन २०१०-११ साली मिळाले. यामुळे नाशिकच्या द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होण्यास मदत झाली. नेदरलॅँड, जर्मनी, युनायटेड किंग्डम, बेल्जियम यांसह चीन, रशिया या देशांमध्येही द्राक्षांना मोठी बाजारपेठ आहे. द्राक्षांसोबत नाशिकच्या वाइनलाही भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. द्राक्षांसोबत वाइनची सर्वाधिक निर्यात करणारे भारतातील नाशिक हे मोठे शहर आहे. लाखो हेक्टर जमिनीवर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. पीजीआय टॅग (प्रोटेक्टेड जिओग्रॅफिकल इंडिकेशन) मिळाल्यानंतर दार्जिलिंग चहाप्रमाणे द्राक्षांना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली होण्यास मदत होईल. हे मानांकन प्राप्त करण्यासाठी स्थानिक द्राक्ष उत्पादकांसह सत्ताधाºयांनी इच्छाशक्ती दाखविणे गरजेचे आहे. भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगच्या चहाकडे शेतीशेत्रात आहे. त्यानंतर नाशिकच्या द्राक्षांना हे मानांकन मिळविण्याची संधी असून द्राक्षे त्या पातळीवर खरे उतरू शकतील, असा विश्वास भौगोलिक मानांकन तज्ज्ञ अ‍ॅड. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केला.भारतात ‘पीजीआय’ केवळ दार्जिलिंगकडेभारतातील विविध राज्यांचे मिळून एकूण ३२२ उत्पादनांकडे ‘जीआय टॅग’ आहे; मात्र दार्जिलिंगमधील चहा हे एकमेव उत्पादन असे आहे की, ते आंतरराष्टÑीय ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते. दार्जिलिंगच्या चहाला जीआयसोबत पीजीआय टॅगदेखील प्राप्त आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत हे ब्रॅन्ड स्थापन झाले आहेत. दार्जिलिंगच्या चहानंतर नाशिकच्या द्राक्षांमध्ये ‘पीजीआय’ मानांकन मिळविण्याची क्षमता आहे. पीजीआय’ येथील द्राक्षांना मिळाला तर आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सुमारे दीडशेहून अधिक देशांमध्ये बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbusinessव्यवसाय