शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

वसतीगृहास जागा देण्यास स्थानिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:20 IST

नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त ठरलेली कॅनडा कॉर्नरजवळील सर्व्हे नंबर ७१८च्या प्लॉट नंबर १० मधील ८५८ चौरस मीटर एवढी जागा शासनाच्या ताब्यात असल्याने सदरची जागा ग्राहक न्याय मंचाच्या कार्यालयासाठी मिळावी, असा प्रस्ताव सर्व प्रथम देण्यात आला होता. त्यानंतर सदरची जागा राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या

ठळक मुद्देजागा हस्तांतरणाचा पेच : महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वसतिगृहासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला

नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर डॉ. पंजाबराव देशमुख शासकीय विद्यार्थी वसतिगृहासाठी कॅनडा कॉर्नर येथील पाटील लेनजवळची जागा देण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी, या ठिकाणी वसतिगृह झाल्यास परिसरातील महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात येईल असा मुद्दा पुढे करीत पाटील लेन व पाटील पार्क येथील रहिवाशांनी वसतिगृहासाठी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. दरम्यान, गुरुवारी शासकीय जागावाटप तांत्रिक समितीची बैठक होऊन त्यात वसतिगृहासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, तथापि, या जागेचा ताबा कोणाकडे द्यायचा याबाबत मात्र पेच निर्माण झाला आहे.नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त ठरलेली कॅनडा कॉर्नरजवळील सर्व्हे नंबर ७१८च्या प्लॉट नंबर १० मधील ८५८ चौरस मीटर एवढी जागा शासनाच्या ताब्यात असल्याने सदरची जागा ग्राहक न्याय मंचाच्या कार्यालयासाठी मिळावी, असा प्रस्ताव सर्व प्रथम देण्यात आला होता. त्यानंतर सदरची जागा राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली होती. तथापि, शासनाच्या कायद्यानुसार शासकीय जमिनीचे वाटप करायचे असल्यास सर्व प्रथम म्हाडा गृह निर्माण विभागाला प्राधान्य देण्यात यावे, असा नियम असल्यामुळे म्हाडा या जागेबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर म्हाडाने जमीन घेण्याची तयारी दर्शविली, तथापि, या संदर्भातील शासकीय कार्यवाही होत असताना आमदार देवयानी फरांदे यांनी सदरची जागा वसतिगृहासाठी मिळावा, अशी मागणी केल्याने याबाबत नागरी जमीन कमाल धारणा कार्यालयाने शासनाकडे सदर जागेच्या मागणीसाठी आजवर मिळालेल्या प्रस्तावांची माहिती शासनाला सादर करण्यात आली मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यावर शासनाने ९ आॅगस्ट रोजी सदरची जागा वसतिगृहासाठी देण्याचे मान्य केल्याचे पत्र दिले. त्यावर गुरुवारच्या तांत्रिक समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येऊन जागा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले, परंतु सदर जागेचा ताबा नेमका कोणाला द्यायचा याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने पेच कायम आहे. दरम्यान, एकीकडे ही बैठक होत असताना दुसरीकडे पाटील पार्क भागातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा न देण्याची मागणी केली. वसतिगृह केल्यास या भागात विद्यार्थ्यांचा राबता वाढेल परिणामी रहिवाशांची शांतता धोक्यात येण्याबरोबरच महिला, मुलींची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक