शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. विद्यापीठातर्फे या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकात समावेश असलेल्या शिक्षणक्रमांच्याच परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने पहिली ते नववी व अकरावीच्या तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षाही रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्याही १९ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने डिसेंबर २०२०मध्ये प्रलंबित राहिलेल्या परीक्षा आता मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना लिंकद्वारे परीक्षा प्रणालीत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना याच लिंकच्या माध्यमातून सराव परीक्षेची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

इन्फो-

अशी होईल ऑनलाईन परीक्षा

ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यासाठी प्रथम कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) टाकावा लागेल. स्‍क्रीनवर दिसणारे नाव बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्याला स्वत:ची जन्मतारीख टाकावी लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासाचा कालावधी मिळेल. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, सकाळ सत्रात सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारच्या सत्रात तीन ते आठ अशी वेळ उपलब्ध असेल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रोग्राम कोडनुसार पेपर किती तारखेला कुठल्या वेळी, कुठल्या लॉग इन स्लॉटमध्ये आहे, हे पाहून विद्यार्थ्याने पुरेशा वेळेआधी परीक्षेला सुरुवात करावी. विद्यार्थांना परीक्षेचा स्लॉट टाईम पाच तासांचा असला, तरी प्रत्यक्ष परीक्षेसाठी वेळ साठ मिनिटांचा देण्यात येणार असून, परीक्षेत ५०पैकी ३० प्रश्न साठ मिनिटात सोडवावे लागणार आहेत. या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांची परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.