नाशिक : गुरुवारी (दि. १९) चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मात्र उघडीप घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मात्र अधूनमधून सूर्यदर्शन होत होते. गेल्या २४ तासांत जिल्हाभरात ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जूनमध्ये उशिरानेच हजेरी लावणाऱ्या मान्सूनने अद्यापही अपेक्षित हजेरी लावलेली नाही. याउलट एप्रिल व मेमध्येच बेमोसमी पाऊस व गारपिटीने शहर व जिल्'ात जोरदार हजेरी लावल्याने शेतपिकांचे नुकसान झाले होते. दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मात्र पाठ फिरविल्याचे चिन्ह होते. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या व जिल्'ाच्या काही प्रमुख तालुक्यांत व गावांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने बळीराजाच्या खरीप हंगामासाठी आशा उंचावल्या होत्या. त्यातच हवामान खात्याने यंदा अपेक्षित पर्जन्यमान होणार नसल्याचे जाहीर केल्याने बळीराजा धास्तावला होता. गेल्या २४ तासांत जिल्'ात अवघ्या ५१.२ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. त्यात नाशिक- १.६ मि.मी., इगतपुरी- २३, दिंडोरी- ०२, पेठ- ०५, त्र्यंबकेश्वर- ०७, कळवण- २.८, सुरगाणा- ३.८, देवळा- ०६ अशी एकूण ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी १ ते २० जूनदरम्यान जिल्'ात २६९६ मिलिमीटरची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी १ ते २० जूनच्या दरम्यान ती अवघी ३९२ मिलिमीटर इतकीच नोेंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पावसाची उघडीप; मात्र वातावरण ढगाळच २४ तासांत ५१ मि.मी. पावसाची हजेरी
By admin | Updated: June 21, 2014 00:58 IST