शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

अधिकाºयांची खोटी माहिती सभागृहात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:44 IST

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देसंशयाच्या भोवºयात२०१६-१७चा निधी अखर्चिक

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांचीही पहिलीच सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. या सभेत अधिकाºयांनी मात्र गिते यांच्यासमोर निष्क्रिय कारभाराचा नमुनाच पेश केला. सन २०१६-१७ चा निधी खर्च का झाला नाही, असा प्रश्न अधिकाºयांना विचारण्यात आल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. किती निधी अखर्चिक राहिला आणि नवीन आलेल्या निधीचा विनियोग करण्याबाबत अधिकाºयांकडून सभागृहाला देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे कुंभार्डे यांनी सप्रमाण उघड केले.अंगवणवाडी बांधकामाचे ११ टेंडर अद्यापही बाकी आहेत. जे टेंडर झाले त्याचा खर्च का झाला नाही आणि इतर टेंडरप्रक्रिया पूर्ण का करण्यात आली नाही याचा खुलासा बांधकाम विभागालाही करता आला नाही. पाणीपुरवठा योजनांसाठीचा निधीचा विनियोग न करण्यात आल्याने दोन वर्षांत केवळ १९८ लक्ष रुपयेच खर्च झाल्याची बाब कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिली.पारंपरिक ऊर्जा स्रोताच्या गेल्या दोन वर्षांपासून ९ कोटींच्या निधीचा खर्चच नाही, तर आदिवासी अािण बिगर आदिवासी भागासाठीचे सुमारे ६ कोटी पडून असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तालुक्यातील कृषी अधिकारी काहीही काम करीत नसल्यामुळेच तालुक्यातून यासाठीचा एकही प्रस्ताव आला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी अशा कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करण्याचा ठराव करण्यात आला. अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्णातील १६ शाळांचे समायोजन हे पुढील शैक्षणिक वर्षापासून केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. भारती पवार यांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा निधी खर्च का झाला नाही आणि विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडले गेले नसेल तर त्यावर तोडगा काढावा अशी सूचना त्यांनी मांडली. कुपोषित मुलांच्या पोषण आहारासाठंी सन २०१६-१७ मध्ये १०० लक्ष निधी प्राप्त झालेला असताना त्यापैकी केवळ ३२.५० लक्ष रुपयेच खर्च झालेला आहे. उर्वरित ६७.५० लक्ष निधी अखर्चिक राहिल्याबाबतची गंभीर बाब कुंभार्डे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कुपोषणासारख्या विषयावर महिला बालकल्याण विभाग गंभीर नसल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.