शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

अधिकाºयांची खोटी माहिती सभागृहात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:44 IST

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देसंशयाच्या भोवºयात२०१६-१७चा निधी अखर्चिक

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांचीही पहिलीच सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. या सभेत अधिकाºयांनी मात्र गिते यांच्यासमोर निष्क्रिय कारभाराचा नमुनाच पेश केला. सन २०१६-१७ चा निधी खर्च का झाला नाही, असा प्रश्न अधिकाºयांना विचारण्यात आल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. किती निधी अखर्चिक राहिला आणि नवीन आलेल्या निधीचा विनियोग करण्याबाबत अधिकाºयांकडून सभागृहाला देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे कुंभार्डे यांनी सप्रमाण उघड केले.अंगवणवाडी बांधकामाचे ११ टेंडर अद्यापही बाकी आहेत. जे टेंडर झाले त्याचा खर्च का झाला नाही आणि इतर टेंडरप्रक्रिया पूर्ण का करण्यात आली नाही याचा खुलासा बांधकाम विभागालाही करता आला नाही. पाणीपुरवठा योजनांसाठीचा निधीचा विनियोग न करण्यात आल्याने दोन वर्षांत केवळ १९८ लक्ष रुपयेच खर्च झाल्याची बाब कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिली.पारंपरिक ऊर्जा स्रोताच्या गेल्या दोन वर्षांपासून ९ कोटींच्या निधीचा खर्चच नाही, तर आदिवासी अािण बिगर आदिवासी भागासाठीचे सुमारे ६ कोटी पडून असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तालुक्यातील कृषी अधिकारी काहीही काम करीत नसल्यामुळेच तालुक्यातून यासाठीचा एकही प्रस्ताव आला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी अशा कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करण्याचा ठराव करण्यात आला. अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्णातील १६ शाळांचे समायोजन हे पुढील शैक्षणिक वर्षापासून केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. भारती पवार यांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा निधी खर्च का झाला नाही आणि विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडले गेले नसेल तर त्यावर तोडगा काढावा अशी सूचना त्यांनी मांडली. कुपोषित मुलांच्या पोषण आहारासाठंी सन २०१६-१७ मध्ये १०० लक्ष निधी प्राप्त झालेला असताना त्यापैकी केवळ ३२.५० लक्ष रुपयेच खर्च झालेला आहे. उर्वरित ६७.५० लक्ष निधी अखर्चिक राहिल्याबाबतची गंभीर बाब कुंभार्डे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कुपोषणासारख्या विषयावर महिला बालकल्याण विभाग गंभीर नसल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.