शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

राज्यातील एकमेव बळी मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:28 IST

आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिक शहराच्या शिवेवर बळीराजाचे मंदिर आहे. याची एक आख्यायिका आहे. एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आली. महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानून त्याचे औक्षण केले. तेव्हापासून ‘इडापीडा जावो, बळीचे राज्य येवो’ या उक्तीनुसार त्या दिवसाला भाऊबीज असे संबोधले जाऊ लागले. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत.

ठळक मुद्देज्या दिवशी प्रत्यक्ष महालक्ष्मी बळीराजाला भेटण्यास आल्या त्या दिवसाला भारतीय हिंदू संस्कृतीत बलिप्रतिपदा संबोधू लागले.

आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिक शहराच्या शिवेवर बळीराजाचे मंदिर आहे. याची एक आख्यायिका आहे. एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आली. महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आपल्या घरी तीन दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्या घरी महालक्ष्मी स्थिर होईल. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीने बळीराजाला आपला भाऊ मानून त्याचे औक्षण केले. तेव्हापासून ‘इडापीडा जावो, बळीचे राज्य येवो’ या उक्तीनुसार त्या दिवसाला भाऊबीज असे संबोधले जाऊ लागले. अशा या बळीराजाचे भारतामध्ये दोनच मंदिरे आहेत. एक महाराष्ट्रात नाशिकमध्ये व एक कर्नाटक राज्यात. नाशिक शहराच्या शिवेवर अलीकडेच नव्याने उभं राहिलेलं मंदिर बळीराजाच्या अस्तित्वाची साक्ष देतं. या मंदिरात पाडव्याच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्त बळी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून, बळी महाराज अमर मित्रमंडळाच्या वतीने बलिप्रतिपदा व भाऊबीज उत्सव साजरा करण्यात येतो.ओझरकडे जाणाºया मार्गावरची नाशिकची शिव म्हणजे बळी महाराज मंदिर. नवीन लग्न झालेली जोडपी शहरात जाताना किंवा येताना श्रीफळ वाढवल्याशिवाय जात नाही. शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंदिराचा अडथळा निर्माण होत होता म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून रासबिहारी शाळेशेजारी असलेल्या सरकारी जागेत मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. अनेक लोकांच्या उदार देणगीतून या ठिकाणी मंदिराची पुनर्उभारणी करण्यात आली. या ठिकाणी गेली ४१ वर्षांपासून सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह या परिसरातील प्रगतिशील शेतकरी वाळूमामा शिंदे, सुनील सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सुरू आहे.बळीराजाची कीर्ती सर्व जगात दानशूर म्हणून पसरलेली असल्याने वामन अवतारात येऊन श्री विष्णूने बळीराजाकडे क्षमा याचना करून तीन पावले जमीन मागितली. बळीराजा हे आपल्या संकल्पापासून जरासेही ढळले नाही. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत तीन पावले जमीन देण्याचा संकल्प सोडण्यासाठी वामन अवतारातील मूर्तीला साकडे घातले आणि श्री विष्णूने आपले खरे रूप प्रकट केले. पहिले पाऊल ठेवताच सर्व पृथ्वी व्यापली, दुसºया पावलाने संपूर्ण स्वर्गलोक व्यापले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू हे विचारल्यानंतर बळीराजाच्या लक्षात आले की आपल्याकडे परमेश्वराला देण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही त्यामुळे तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवण्याची विनंती भगवान श्री विष्णूंना केली. त्यामुळे त्यांना इंद्रपद न मिळता अमरत्व प्राप्त झाले व बळीराजाला संपूर्ण राज्य देऊन स्वत: भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या महालापुढे द्वारपाल म्हणून उभे राहून त्यांचे रक्षण केले. ज्या दिवशी प्रत्यक्ष महालक्ष्मी बळीराजाला भेटण्यास आल्या त्या दिवसाला भारतीय हिंदू संस्कृतीत बलिप्रतिपदा संबोधू लागले.अभिजित राऊत