शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

केवळ ‘खांबांचा’ पुरवठा

By admin | Updated: August 4, 2015 22:59 IST

सौर पथदीप : जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत ठेकेदारावर कारवाईचा निर्णय

नाशिक : तीन कोटींची सौर पथदीप खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता नव्याने सव्वा कोटींच्या सौर पथदीपांचा पुरवठाच झालेला नसल्याची धक्कादायक बाब नव्याने उजेडात आली आहे. मुदत उलटूनही पुरवठा न करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य रवींद्र जाधव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. देवरे यांनी ऊर्जा अधिकारी विजय उगले यांना विचारले की, ग्रामपंचायतींना करावयाच्या सौर पथदीपांचे दोन पुरवठा आदेश देण्यात आले होते काय? निफाडसह काही तालुक्यांत सौर पथदीपांऐवजी फक्त लोखंडे दांडे आणि बॅटरीचा पुरवठा करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पंचायत समिती सदस्य अनिल पाटील यांनीही याबाबत आपल्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. त्यावर तीन कोटींचा पुरवठा आदेश रद्द करण्यात आल्याचे तसेच संपूर्ण साहित्य बसविल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असा पवित्रा ऊर्जा अधिकारी विजय उगले यांनी घेतला. त्यावर शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी सौर पथदीपांचे दोन आदेश देण्यात आले होते काय? अशी विचारणा उगले यांना करताच त्यांनी एक पुरवठा आदेश तीन कोटींचा एप्रिल महिन्यात देण्यात आला होता. या आदेशानुसार मे महिन्यात ८० ग्रामपंचायतींना सौर पथदीपांचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र पुरवठादाराने अद्यापही सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने तो ठेका रद्द करून नव्याने ई-निविदा काढण्यात येणार आहे. तसेच दुसरा सव्वा कोटी रुपयांचा सौर पथदीप पुरविण्याचा ठेका एका कंपनीला दिला असून, त्यांचीही मुदत मे महिन्यातच होती. मात्र काही ठिकाणी अजूनही सौर पथदीप बसविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या रवींद्र देवरे व प्रवीण जाधव यांनी सौर पथदीप नव्हे, तर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये केवळ पथदीपाचे लोखंडी दांडे व बॅटरी बसविण्यात आले असून, एकाही ठिकाणी सौरचे पॅनल बसविण्यात आलेले नसल्याचा आरोप केला. संबंधित ठेकेदाराने वेळेत पुरवठा न केल्याबद्दल त्याच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करा, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिले.(प्रतिनिधी)कोल्हापूरची पुनरावृत्ती होऊ न देण्याचा सल्ला ४रवींद्र देवरे यांनी सभेत संबंधित पुरवठादाराला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने सदस्यांची पूर्तता न केल्यानेच ही वेळ आल्याची माहिती दिली. ती सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांना लांच्छनास्पद असल्याचा आरोप विजय उगले यांच्यावर केला असता उगले यांनी आपण असे ठेकेदाराकडे बोललोच नाही, असा पवित्रा घेतला. त्याचाच धागा पकडून शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी नको त्या प्रकरणात सापडले आहेत. यापुढे तरी असे घडणार नाही, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांना ताकीद द्यावी, असे सांगितले.४ त्यावर मिश्किलपणे प्रा. अनिल पाटील यांनी सीईओंनी नेमकी काय ताकीद द्यायची, जादा घेण्याची की कमी घेण्याची, असा टोला मारला. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सीईओंच यावर उत्तमप्रकारे सांगू शकतील, असे सांगितले. त्यांच्या पात्रतेमुळे त्यांना फळे मिळाली, असे मार्मिक उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले. त्याचवेळी नाशिकला कोल्हापूरची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी तुम्हीही घ्या, असा खोचक सल्ला सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.