शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

केवळ ‘खांबांचा’ पुरवठा

By admin | Updated: August 4, 2015 22:59 IST

सौर पथदीप : जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत ठेकेदारावर कारवाईचा निर्णय

नाशिक : तीन कोटींची सौर पथदीप खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असतानाच आता नव्याने सव्वा कोटींच्या सौर पथदीपांचा पुरवठाच झालेला नसल्याची धक्कादायक बाब नव्याने उजेडात आली आहे. मुदत उलटूनही पुरवठा न करणाऱ्या संबंधित पुरवठादारावर दंडाची कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य रवींद्र जाधव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. देवरे यांनी ऊर्जा अधिकारी विजय उगले यांना विचारले की, ग्रामपंचायतींना करावयाच्या सौर पथदीपांचे दोन पुरवठा आदेश देण्यात आले होते काय? निफाडसह काही तालुक्यांत सौर पथदीपांऐवजी फक्त लोखंडे दांडे आणि बॅटरीचा पुरवठा करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पंचायत समिती सदस्य अनिल पाटील यांनीही याबाबत आपल्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. त्यावर तीन कोटींचा पुरवठा आदेश रद्द करण्यात आल्याचे तसेच संपूर्ण साहित्य बसविल्याशिवाय देयक अदा केले जाणार नाही, असा पवित्रा ऊर्जा अधिकारी विजय उगले यांनी घेतला. त्यावर शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी सौर पथदीपांचे दोन आदेश देण्यात आले होते काय? अशी विचारणा उगले यांना करताच त्यांनी एक पुरवठा आदेश तीन कोटींचा एप्रिल महिन्यात देण्यात आला होता. या आदेशानुसार मे महिन्यात ८० ग्रामपंचायतींना सौर पथदीपांचा पुरवठा करण्यात येणार होता. मात्र पुरवठादाराने अद्यापही सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने तो ठेका रद्द करून नव्याने ई-निविदा काढण्यात येणार आहे. तसेच दुसरा सव्वा कोटी रुपयांचा सौर पथदीप पुरविण्याचा ठेका एका कंपनीला दिला असून, त्यांचीही मुदत मे महिन्यातच होती. मात्र काही ठिकाणी अजूनही सौर पथदीप बसविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या रवींद्र देवरे व प्रवीण जाधव यांनी सौर पथदीप नव्हे, तर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये केवळ पथदीपाचे लोखंडी दांडे व बॅटरी बसविण्यात आले असून, एकाही ठिकाणी सौरचे पॅनल बसविण्यात आलेले नसल्याचा आरोप केला. संबंधित ठेकेदाराने वेळेत पुरवठा न केल्याबद्दल त्याच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करा, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिले.(प्रतिनिधी)कोल्हापूरची पुनरावृत्ती होऊ न देण्याचा सल्ला ४रवींद्र देवरे यांनी सभेत संबंधित पुरवठादाराला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने सदस्यांची पूर्तता न केल्यानेच ही वेळ आल्याची माहिती दिली. ती सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांना लांच्छनास्पद असल्याचा आरोप विजय उगले यांच्यावर केला असता उगले यांनी आपण असे ठेकेदाराकडे बोललोच नाही, असा पवित्रा घेतला. त्याचाच धागा पकडून शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी नको त्या प्रकरणात सापडले आहेत. यापुढे तरी असे घडणार नाही, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वांना ताकीद द्यावी, असे सांगितले.४ त्यावर मिश्किलपणे प्रा. अनिल पाटील यांनी सीईओंनी नेमकी काय ताकीद द्यायची, जादा घेण्याची की कमी घेण्याची, असा टोला मारला. त्यावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सीईओंच यावर उत्तमप्रकारे सांगू शकतील, असे सांगितले. त्यांच्या पात्रतेमुळे त्यांना फळे मिळाली, असे मार्मिक उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले. त्याचवेळी नाशिकला कोल्हापूरची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी तुम्हीही घ्या, असा खोचक सल्ला सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.