शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

डाम ‘डौल’णाया अधिकाऱ्यांचे ‘नाथ’ एकच

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

डाम ‘डौल’णाया अधिकाऱ्यांचे ‘नाथ’ एकच

गणेश धुरी तसे पाहिले तर मिनी मंत्रालयाची पायरी सर्वसामान्यांना चढतानाच येथे राजकारण पदोपदी असेल, हा जो काही होरा असतो, तो प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोच. नाही म्हटले तरी याच मिनी मंत्रालयातील लोकप्रतिनिधींच्या वावरामुळे काही प्रमाणात त्याची लागण अधिकाऱ्यांना आणि रावसाहेबांनाही झाल्याशिवाय राहत नाही. मग त्यातूनच शासकीय योजना आणि उपक्रम राबवितानाही साहजिकच याच राजकारणाच्या शिरकावामुळे योजनांचा आणि उपक्रमांचा बट्ट्याबोळ होण्यास वेळ लागत नाही. काल-परवा जिल्हा परिषदेत विभागीय आयुक्तांनी जी काही बाराखडी अधिकाऱ्यांकडून उजळून घेतली, त्यातूनही हेच सारे उघड झाले. एकमात्र खरे की, अधिकाऱ्यांना वेळोवेळी चुचकारल्याशिवाय तेही ‘क्षमते’नुसार ‘कार्य’ करीत नाहीत.विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांच्या आढावा बैठकांचा ‘फड’ भरविला आहे. त्यात पहिला क्रमांक अर्थातच नाशिक जिल्हा परिषदेचा लागला. गणगौळण आणि वग होऊनही अधिकारी काही केल्या मंचावर आपले अंगभूत ‘रंग’ दाखविनासे झाले म्हटल्यावर आयुक्तांनीच मग आपल्या शिस्तीचे आणि नियमाचे ‘पाठ’ पढविण्यास सुरुवात करताच भल्या भल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडू लागली. काहींना वयोमानानुसार त्यांच्यातील कलाकुसरीला वाव देता जमेना, मग आयुक्तांनीच त्यांना आता तुम्हाला शासकीय सेवेच्या ‘मध्यंतराची’ गरज असल्याचे सांगूनही टाकले. वास्तविक तसे पाहता मिनी मंत्रालय अर्थातच जिल्हा परिषदेतील कारभार करायचा तर येथील कारभाऱ्यांना पुढाऱ्यांच्या रंगती-संगतीनुसारच वागावे लागते. येथे कारभार हाकायचा तर त्यासाठी ‘काळू-बाळू’चीही जोडी ओघाने आलीच. नाही तरी थेट सर्वसाधारण सभांनाच आता जर कोणी ‘तमाशा’ म्हणून संबोधणार असेल आणि येथील सभासदांनाच जर कोणी ‘काळू-बाळू’ म्हणणार असेल तर साहजिकच त्याचा परिणामही यंत्रणेतील घटकांवर होणारच. फार मागे नाही चार-दोन महिन्यांपूर्वीच येथील सभासदांना एका दमदार पुढाऱ्याने थेट ‘चिंधी-चोर’ ही उपाधीही तमाशातील बक्षिसी म्हणून देऊन टाकली होती. त्यावरूनही बराच गदारोळ उडाला होता. त्यामुळे कामकाज करताना जर अधिकाऱ्यांना त्यांच्या योजनांचीच आणि उपक्रमांचीच माहिती आपल्या प्रमुखाला देता येत नसेल, तर त्यात इतके गहजब करायचे कारण तरी काय? नाही आयुक्त महोदयांनी ‘डोंगर-दरी’तील भागाचे काम पाहणाऱ्या अशाच एका आयुष्याच्या सायंकाळकडे झुकलेल्या कलाकारला (चुकलेच अधिकाऱ्याला) थेट कामकाजातून ‘निवृत्ती’ घेण्याचा सल्लाच देऊन टाकला. त्याचप्रमाणे डोंगर-दऱ्यांमध्येच पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम राबविणाऱ्या कलाकारांनाही त्यांच्या कला-गुणांना आयुक्तांच्या तोंडी परीक्षेत वाव देता आला नाही. त्यामुळे हे खरोखरीच नेमके काय करतात, असे म्हणत कपाळावर हात मारण्याची वेळ आयुक्तांवर आली. या मिनी मंत्रालयात एकांकिका किंवा नाटक नव्हे तर ‘महानाट्य’च रंगते, याची तोपर्यंत कल्पना आयुक्त महाराजांना येऊन गेली. त्यामुळेच पुढच्या खेळात जेव्हा मी येईल, तेव्हा सर्वच पात्रांनी व कलाकारांनी (अर्थात अधिकाऱ्यांनी) आपापल्या अंगभूत (विभागाच्या) कलागुणांना (कामकाजाला) जर शिस्तीचा आणि नियमाचा वाव दिला नाही तर आपण आपल्या पद्धतीने महानाट्य घडवू, असेच बहुधा आयुक्त महाराजांना म्हणायचे असेल. त्यातल्या त्यात नव्यानेच रुजू झालेल्या येथील प्रधानजींना (अर्थात त्यांच्या नावातही सुख आणि देव दोन्हीही आहेच.) शासकीय योजना तळागाळात पोहोचवून त्यांच्या कामाचे चीज करायची प्रचंड इच्छाशक्ती आहे, मात्र मिनी मंत्रालयाच्या दरबारातील ‘नऊ-रत्न’ त्यांना कितपत साथ-संगत करतात, यावरच बरेच काही अवलंबून आहे.