शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती

By admin | Updated: September 14, 2014 00:55 IST

बलस्थाने कळली तरच उत्कृष्ट नवनिर्मिती

  नाशिक : नाटक हे असे माध्यम आहे की ज्यामधून आपण विचारांचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर मांडू शकतो़ नाटक आणि सिनेमा या दोघांमध्येही प्रेक्षकाचा बुद्धयांक लक्षात घेऊन लिखाण केले तरच तुम्ही प्रेक्षकांना सकस देऊ शकतात़ अर्थात ही दोन्ही माध्यमे वेगळी असून त्यांची बलस्थाने लेखक व दिग्दर्शकाला उमगल्यानंतरच उत्कृष्ट नवनिर्मिती होते असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी यांनी केले़ ज्योती स्टोअर्स व निर्माण ग्रुप यांच्यावतीने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमातंर्गत ‘नाटक ते सिनेमा’ या विषयावर ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रेक्षक हा नाटक वा चित्रपट पाहून थांबत नाही तर तो व्यक्त करतात़ त्यामुळे लेखकाला हे सर्व भान ठेवूनच लिहावे लागते़ समाजवादी वडील व उदारमतवादी कुटुंब याबरोबरच घरातील चळवळीचे वातावरण यामुळे लेखक झाले़ तसेच नाटकामध्ये अनुभव विश्वातून जन्म घेईल तेच लिहायचे असे ठरविले़ लेखक होण्यासाठी समोरच्याबद्दलचे कुतुहल आवश्यक असते़ नाटक लिहितांना प्रेक्षक हा हुशार आहे असे समजून लिहिले तरच लेखक सवंग लिहू शकतो़ तसेच नाटक वा चित्रपट तयार करताना व्यवसायिकतेऐवजी गुणात्मक यश मिळवायचे या ध्येयाने काम केल्याचे दळवी म्हणाले़ नाट्य चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, नाटक ही शिकण्याची गोष्ट असून त्याची संकल्पना ही अभ्यासक्रमातच समजली़ नाटक बघतांना प्रेक्षकाचे पंचेद्रिय एकत्र होत असून त्याचा आयक्यू, इक्यू एकत्र होतो त्यामुळे ते परमानंट मेमरीत सेव्ह होते़ सिनेमाची कथा लिहितांना ती दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लिहिणे गरजेचे असते़ सिनेमात दिग्दर्शक व कॅमेरामन यांची पती-पत्नीच्या भूमिका आवश्यक असते़ त्यामुळे नाटक हे सादरीकरणाचे तर सिनेमा फुलवावा लागतो़ टीव्हीवरील मालिकांमुळे प्रेक्षकांची अभिरुची कमी होत असल्याचेही कुलकर्णी म्हणाले़ यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड़ शशिकांत पवार, वनाधिपती विनायकदादा पाटील, सी़ एल़ कुलकर्णी उपस्थित होते़ सूत्रसंचालन वसंत खैरनार यांनी केले़ (प्रतिनिधी)