शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अवकाळी पावसाच्या नुकसानीचा फक्त अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:19 IST

जिल्ह्यातील बागलाण व देवळा तालुक्यांत वादळी वारा व अवकाळी पावसाने जोरदार  हजेरी लावून शेतपिकांचे मोठे नुकसान केले असले तरी, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश न देता फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील बागलाण व देवळा तालुक्यांत वादळी वारा व अवकाळी पावसाने जोरदार  हजेरी लावून शेतपिकांचे मोठे नुकसान केले असले तरी, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश न देता फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.  सध्या उन्हाळ कांदा काढणीचे काम वेगाने सुरू असून, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांतील शेतकरी कांदा काढून तो खळ्यावर साठवून ठेवत आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भावही कोसळल्यामुळे विक्रीला नेण्यापेक्षा तो चांगला भाव मिळेपर्यंत साठवणुकीवर भर दिला जात असतानाच गुरुवारी दुपारी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने बागलाण व देवळा तालुक्याला तुफान झोडपून काढले. अनेक शेतकºयांचा शेतातील उभा कांदा जमीनदोस्त झाला, तर खळ्यात काढून उघड्यावर ठेवलेला कांदा पावसात भिजून खराब झाला आहे. याशिवाय शेतामध्ये पाणी साचल्याने लागवडीखालील पिकांना किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषत: भाजीपाला पिकाला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. काही भागातील डाळींब व द्राक्ष पिकांनाही या पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकसान झालेल्या शेतकºयांच्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. गुरुवारी पावसाने जोरदार झोडपून काढले असले तरी, महसूल खात्याच्या मंडळ कार्यालयात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात त्याची नोंद झालेली नसल्यामुळे प्रशासनाच्या लेखी जिल्ह्णात किती पाऊस झाला याची आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार ज्या ज्या भागात अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले त्या भागातील नुकसानीचा अंदाज कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय