शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जिल्ह्यात रविवारी एकमेव मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:00 IST

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण नवीन वर्षात कमी होताना दिसत असतानाच मृत्युचे प्रमाणदेखील हळूहळू कमी होऊ लागले आहे. रविवारी (दि. १०) जिल्ह्यात २१३ रुग्ण कोरोनामुक्त तर १८५ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण नवीन वर्षात कमी होताना दिसत असतानाच मृत्युचे प्रमाणदेखील हळूहळू कमी होऊ लागले आहे. रविवारी (दि. १०) जिल्ह्यात २१३ रुग्ण कोरोनामुक्त तर १८५ रुग्ण नव्याने बाधित झाल्याचे आढळले आहे. दरम्यान काल नाशिक ग्रामीणला एकमेव नागरिकाचा मृत्यु झाला असून त्यामुळे बळींची संख्या २०११ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ४७८ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार ७९५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,६७२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२७, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९३.०८, तर जिल्हाबाह्य ९३.८६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५६ हजार ७८२ असून, त्यातील ३ लाख ४३ हजार २७७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार ४७८ रुग्ण बाधित आढळून आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या