शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 23:05 IST

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

 त्र्यंबकेश्वर : अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना केवळ मनस्तापच दिला आहे. शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्त्या झाल्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.काळा पैसा हुडकण्याच्या नावाखाली आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. पण यात गरिबांंचेच नुकसान झाले. नोटाबंदी केली; पण परिणाम विपरीत झाला. आपलेच पैसे आपल्यालाच मिळेनात, विकासदराच्या मुद्द्यावर बोलताना सरकार म्हणते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण मला तर कुठे दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी उडविली. नाशिकमध्ये परदेशी कंपन्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे काय? शिवसेना भाजपाची युती जागावाटपावरून नाही, मतभेद झाले म्हणून नाही तर मुंबई महापालिकेचे बजेट भाजपालाच पाहिजे. आमच्याच ताब्यात असले पाहिजे म्हणून युती तुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक परवेज कोकणी यांनी केले. यावेळी बाळासाहेब वाघ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर अ‍ॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, शोभा मगर, आमदार जयंत जाधव, नितीन पवार, डॉ. भारती पवार, उत्तमबाबा भालेराव, नानासाहेब महाले, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, सचिन पिंगळे, रवींद्र सपकाळ, दीपक वाघ आदिंसह त्र्यंबकेवरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते भिवा राजू महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात यांचा समावेश आहे. (वार्ताहर)