शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 23:05 IST

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

 त्र्यंबकेश्वर : अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना केवळ मनस्तापच दिला आहे. शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्त्या झाल्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.काळा पैसा हुडकण्याच्या नावाखाली आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. पण यात गरिबांंचेच नुकसान झाले. नोटाबंदी केली; पण परिणाम विपरीत झाला. आपलेच पैसे आपल्यालाच मिळेनात, विकासदराच्या मुद्द्यावर बोलताना सरकार म्हणते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण मला तर कुठे दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी उडविली. नाशिकमध्ये परदेशी कंपन्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे काय? शिवसेना भाजपाची युती जागावाटपावरून नाही, मतभेद झाले म्हणून नाही तर मुंबई महापालिकेचे बजेट भाजपालाच पाहिजे. आमच्याच ताब्यात असले पाहिजे म्हणून युती तुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक परवेज कोकणी यांनी केले. यावेळी बाळासाहेब वाघ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर अ‍ॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, शोभा मगर, आमदार जयंत जाधव, नितीन पवार, डॉ. भारती पवार, उत्तमबाबा भालेराव, नानासाहेब महाले, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, सचिन पिंगळे, रवींद्र सपकाळ, दीपक वाघ आदिंसह त्र्यंबकेवरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते भिवा राजू महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात यांचा समावेश आहे. (वार्ताहर)