शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

By admin | Updated: February 1, 2017 23:05 IST

केंद्र व राज्य सरकारकडून केवळ मनस्ताप : अजित पवार

 त्र्यंबकेश्वर : अडीच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना केवळ मनस्तापच दिला आहे. शेतकऱ्यांना तर देशोधडीला लावले. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे भाजपा काळात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्त्या झाल्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्याप्रसंगी केले.काळा पैसा हुडकण्याच्या नावाखाली आम्हीही त्यांना पाठिंबा दिला. पण यात गरिबांंचेच नुकसान झाले. नोटाबंदी केली; पण परिणाम विपरीत झाला. आपलेच पैसे आपल्यालाच मिळेनात, विकासदराच्या मुद्द्यावर बोलताना सरकार म्हणते आठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली; पण मला तर कुठे दिसत नाही अशी खिल्ली त्यांनी उडविली. नाशिकमध्ये परदेशी कंपन्यांनी कुठे गुंतवणूक केली आहे काय? शिवसेना भाजपाची युती जागावाटपावरून नाही, मतभेद झाले म्हणून नाही तर मुंबई महापालिकेचे बजेट भाजपालाच पाहिजे. आमच्याच ताब्यात असले पाहिजे म्हणून युती तुटली असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रास्ताविक परवेज कोकणी यांनी केले. यावेळी बाळासाहेब वाघ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर अ‍ॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे, आमदार दीपिका चव्हाण व नरहरी झिरवाळ, विष्णुपंत म्हैसधुणे, अर्जुन टिळे, शोभा मगर, आमदार जयंत जाधव, नितीन पवार, डॉ. भारती पवार, उत्तमबाबा भालेराव, नानासाहेब महाले, दिलीप बनकर, तुकाराम दिघोळे, सचिन पिंगळे, रवींद्र सपकाळ, दीपक वाघ आदिंसह त्र्यंबकेवरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठनेते भिवा राजू महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात यांचा समावेश आहे. (वार्ताहर)