शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

४१५ घरांचे अवघे ८५ लाखही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...

नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही.

गतवर्षी जूनमध्ये जिल्ह्यातून निसर्ग चक्रीवादळ जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पुढे सरकणाऱ्या चक्रीवादळाने दिशा बदलली आणि कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या कालावधीत जिल्ह्यात जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५३० हेक्टरवरील पिकांना या वादळाचा फटका बसला होता तर ४१५ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरांचे छत व पत्रे उडाले होते तर अनेक ठिकाणी भिंत खचल्या तसेच भिंतीदेखील कोसळल्याने अनेकांना रात्र उघड्यावर काढावी लागली होती.

जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ३०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला होता. त्यापैकी २२२ कोटी ९८ लाख ९१ हजारांची मदत जिल्ह्याला मिळाली. मिळालेल्या रकमेपैकी फळबागा, शेतपिके, पशुधन आदींसाठी २२२ कोटी १३ लाख ९१ हजारांची मदतीचा त्यात समावेश होता. त्यात घर पडझडीची मदत प्राप्त झाली नव्हती. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वर्षभरानंतर का होईना या जूनमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.