शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

पेठ तालुक्यात चार टक्केच भात लावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

पेठ : पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी पावसाने वक्रदृष्टी केली असून ,जुलै महिन्याच्या मध्यावर केवळ ...

पेठ : पावसाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी पावसाने वक्रदृष्टी केली असून ,जुलै महिन्याच्या मध्यावर केवळ ४ टक्के भाताची लागवड होऊ शकली असल्याने ऐन पावसाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हात रोपे वाचविण्याची केविलवाणी धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला भात व नागलीची लावणी पूर्ण करून शेतकरी पंढरपूरच्या वारीकडे प्रस्थान होत असल्याची परंपरा होती. कोरोनामुळे दोन वर्षापासून वारी बंद असली तरी इकडे वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने आषाढी एकादशीलासुध्दा भात लावणी करता आली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरवर्षी जुलै महिन्यात संततधार पाऊस धुमाकूळ घालतो, सध्या मात्र कडक ऊन पडत असल्याने लावणी तर सोडाच, पेरणी केलेली रोपे वाचविण्यासाठी बादलीने पाणी घालावे लागत आहे.

पेठ तालुक्याचे सन २०२१-२२ चे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २७ हजार ४४९ हेक्टर असून, त्यामध्ये भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, कुळीद, भुईमूग आदी खरीप पिकांचा समावेश आहे. यामध्ये भात, नागली व वरई या तीन पिकांची पुनर्लावणी खोळंबली असून इतर पिकांची पेरणीही रखडली आहे. काही प्रमाणात पाण्याची सुविधा असलेले शेतकरी वीजपंप, ऑईल मशीनचा वापर करून लावणी करण्यासाठी कसरत करताना दिसून येत आहेत.

कृषी विभागाचे बांधावर समुपदेशन तालुका कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खरीप पीक आराखड्यानुसार जूलैअखेर १०० टक्के लावणी अपेक्षित असताना केवळ ४ टक्के पेरणी होऊ शकल्याने तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडल कृषी अधिकारी मुकुंद महाजन, श्रीरंग वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. हवामानाचा अंदाज व पावसाची पूर्ण खात्री असल्याशिवाय कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी लावणीची घाई करू नये, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

इन्फो

खरीप पीक पेरणी आराखडा

सरासरी क्षेत्र : २७,४४९.४० हेक्टर

रोपवाटिका क्षेत्र -२०३७.०५ हेक्टर

प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र - १०६१.७५ हेक्टर

टक्केवारी - ३.८७ टक्के

फोटो - १८ पेठ राइस

पावसाने दडी मारल्याने ऑईल मशीनच्या पाण्यावर चारसूत्री पध्दतीने भाताची लावणी करताना पेठ तालुक्यातील शेतकरी.

180721\18nsk_4_18072021_13.jpg

फोटो - १८ पेठ राइस पावसाने दडी मारल्याने ऑईल मशीनच्या पाण्यावर चारसुत्री पध्दतीने भाताची लावणी करतांना पेठ तालुक्यातील शेतकरी.