शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

जिल्ह्यातील धरणसाठा अवघा २७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस ...

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या कालावधीत २९ टक्के इतका साठा शिल्लक होता.

जिल्ह्यात लहान, मोठे असे २४ धरण प्रकल्प असून ६५,६६४ दशलक्ष घनफूट संकल्पित उपयुक्त पाणीसाठा क्षमता आहे. त्यातील मोठ्या प्रकल्पाची क्षमता ४८,००४ दलघफू तर मध्यम प्रकल्पाची क्षमता १७,६६० दलघफू इतकी संकल्पित क्षमता आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २७ इतकी आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा केवळ दोन टक्क्यांनी कमी असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी १९,२४१ इतका उपयुक्त जलसाठा होता तर सद्य:स्थितीत १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही जिल्ह्यात केवळ १३.८४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. इगतपुरी, सुरगाणा, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही इतरत्र चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचे क्षेत्र अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही अजून अपेक्षित पाऊस झालेला नाहीे.

आदिवासी डोंगरी भागात पडणाऱ्या पावसाव्यतिरिक्त जिल्हा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास दुबार पेरणीची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.

मागील हंगामात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नाही अशी काहीशी परिस्थिती होती. परंतु जूनपासूनच धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. त्यातील काही टँकर्स जूनच्या मध्यानंतर कमी झाले असले तरी आता पुन्हा टँकर्सची मागणी होण्याची शक्यता आहे.