शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

जिल्ह्यातील धरणसाठा अवघा २७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस ...

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या कालावधीत २९ टक्के इतका साठा शिल्लक होता.

जिल्ह्यात लहान, मोठे असे २४ धरण प्रकल्प असून ६५,६६४ दशलक्ष घनफूट संकल्पित उपयुक्त पाणीसाठा क्षमता आहे. त्यातील मोठ्या प्रकल्पाची क्षमता ४८,००४ दलघफू तर मध्यम प्रकल्पाची क्षमता १७,६६० दलघफू इतकी संकल्पित क्षमता आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २७ इतकी आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा केवळ दोन टक्क्यांनी कमी असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी १९,२४१ इतका उपयुक्त जलसाठा होता तर सद्य:स्थितीत १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही जिल्ह्यात केवळ १३.८४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. इगतपुरी, सुरगाणा, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही इतरत्र चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचे क्षेत्र अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही अजून अपेक्षित पाऊस झालेला नाहीे.

आदिवासी डोंगरी भागात पडणाऱ्या पावसाव्यतिरिक्त जिल्हा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास दुबार पेरणीची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.

मागील हंगामात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नाही अशी काहीशी परिस्थिती होती. परंतु जूनपासूनच धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. त्यातील काही टँकर्स जूनच्या मध्यानंतर कमी झाले असले तरी आता पुन्हा टँकर्सची मागणी होण्याची शक्यता आहे.