शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणसाठा अवघा २७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस ...

नाशिक : मागील दोन वर्षांत वरुणराजाची कृपा बरसलेल्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी आता तळ गाठण्यास सुरुवात केली असून जून अखेरीस जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या कालावधीत २९ टक्के इतका साठा शिल्लक होता.

जिल्ह्यात लहान, मोठे असे २४ धरण प्रकल्प असून ६५,६६४ दशलक्ष घनफूट संकल्पित उपयुक्त पाणीसाठा क्षमता आहे. त्यातील मोठ्या प्रकल्पाची क्षमता ४८,००४ दलघफू तर मध्यम प्रकल्पाची क्षमता १७,६६० दलघफू इतकी संकल्पित क्षमता आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी २७ इतकी आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा केवळ दोन टक्क्यांनी कमी असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी १९,२४१ इतका उपयुक्त जलसाठा होता तर सद्य:स्थितीत १७,६८५ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी अजूनही जिल्ह्यात केवळ १३.८४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. इगतपुरी, सुरगाणा, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांव्यतिरिक्त अजूनही इतरत्र चांगला पाऊस झालेला नाही. पावसाचे क्षेत्र अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरलाही अजून अपेक्षित पाऊस झालेला नाहीे.

आदिवासी डोंगरी भागात पडणाऱ्या पावसाव्यतिरिक्त जिल्हा कोरडा असल्याने शेतकऱ्यांना पिकाची चिंता लागली आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास दुबार पेरणीची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.

मागील हंगामात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नाही अशी काहीशी परिस्थिती होती. परंतु जूनपासूनच धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. त्यातील काही टँकर्स जूनच्या मध्यानंतर कमी झाले असले तरी आता पुन्हा टँकर्सची मागणी होण्याची शक्यता आहे.