शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:20 IST

नाशिक : मागील आठवड्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना दुसरीकडे धरणांमधील जलसाठ्याने तळ गाठला आहे. ...

नाशिक : मागील आठवड्यात बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असताना दुसरीकडे धरणांमधील जलसाठ्याने तळ गाठला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लहान-मोठ्या जलप्रकल्पांमध्ये अवघा २४ टक्के जलसाठा शिल्लक अजून पावसाची प्रतीक्षा लांबली, तर पाण्याची पातळी आणखी कमी होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली होती. सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला, तर धरणांतील पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्याने जिल्ह्याला पाण्याची कमतरता जाणवली नाही. गेल्यावर्षी दमदार पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यांमधील धरणांमधून विक्रमी पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला. धरणे काठोकाठ भरल्यामुळे जूनअखेरपर्यंतही जिल्ह्याला पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता जूनच्या मध्यावरच जलसाठा अवघा २४ टक्क्यावर आल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील धरणसमूहांमध्ये २४ टक्के जलसाठा असून मागीलवर्षी जूनच्या पंधरवड्यात ३० टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. यंदा कडाक्याच्या उन्हामुळे धरणसाठा अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे. पावसाची प्रतीक्षा लांबली तर असलेल्या जलसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. जूनचे पंधरा दिवस उलटून गेले असून नाशिक जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे, काही दिवस पावसाच्या परिस्थितीवर धरणांची पातळी अवलंबून असणार आहे. जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठा कमी होत असल्याने आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

धरणांमधील एकूण पाणी साठवण क्षमतेच्या सरासरी २४ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यंदा मान्सून शंभर टक्के बरसणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. मात्र जूनमध्ये अजूनही पाऊस बरसला नसल्याने उपयुक्त जलसाठा कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या १५६६२ दशलक्ष घनफूट म्हणजेच २४ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर मागीलवर्षी १९६८२ द.ल.घ.फू. म्हणजेच ३० टक्के जलसाठा शिल्लक होता.

जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक धरणांमध्ये १० ते ३० टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे, तर नांदुरमध्यमेश्वरमध्ये १०० टक्के, तर वालदेवी धरणात ६६ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

--इन्फो--

गंगापूर धरणात ४० टक्के

गंगापूर धरणात ४० टक्के जलसाठा आहे, तर समूहाची टक्केवारी २९ टक्के इतकी आहे. त्यामध्ये काश्यपीत १७, गौतमी गोदावरीत १६, तर आळंदी धरणात १० टक्के इतका जलसाठा आहे. पालखेड धरणसमूहात देखील १३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.