शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये हरित क्षेत्र उरणार अवघे २० टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:13 IST

वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हरित क्षेत्र अवघे २० टक्के राहणार आहे. त्यामुळे निसर्ग तर उद्ध्वस्त होईलच शिवाय नाशिककरांना तपमानवाढीसारख्या अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हरित क्षेत्र अवघे २० टक्के राहणार आहे. त्यामुळे निसर्ग तर उद्ध्वस्त होईलच शिवाय नाशिककरांना तपमानवाढीसारख्या अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  कोणे एकेकाळी नाशिक हे दंडाकारण्य म्हणून परिचित होते. निसर्गसंपदा हे नाशिकचे वैशिष्ट्य होते. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही शहराचा लौकिक होता. नाशिकमध्ये स्थायिक होण्यासाठी त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीचा आकर्षण बिंदूदेखील नाशिकचे हवापाणी हाच होता. परंतु आता हे सर्व बदलू लागले आहे. एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीच्या पार गेला आणि आता तर वाढत्या रहिवास क्षेत्रामुळे वातावरणातील बदलासह अन्य अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.  नाशिक महापालिकेचे क्षेत्रफळ २५९.१२ चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच २६ हजार ७४७ हेक्टर इतके आहे. नाशिक महापालिकेचा पहिला विकास आराखडा १९९२ ते ९५ दरम्यान मंजूर झाला. त्यावेळी ५ हजार ८७५ हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी करण्यात आले होते. म्हणजे त्यावेळची वने, औद्योगिक आणि आर्टिलरीसारखे क्षेत्र वगळून या विकसित होऊ शकणाऱ्या क्षेत्राचा विचार केला तर ते ५२.४८ टक्के इतके होते. परंतु आता दुसरा विकास आराखडा करण्यात आला, तोपर्यंत हे रहिवास क्षेत्र पूर्णत: विकसित होऊ शकले नाही व अवघे ४१.१ टक्के इतकेच क्षेत्र विकसित होऊ शकले आहे. असे असताना नव्या आराखड्यात भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र विकसित करण्यात आले आहे.  नव्या आराखड्यात १५ हजार ४४ हेक्टर क्षेत्र रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले असून, त्याची एकूण क्षेत्रफळाशी तुलना केली तर ती ७८. ७९ टक्के इतकी आहे. तर उर्वरित क्षेत्र ज्यात नदी, नाले, वने आणि क्षेत्राचा विचार केला तर ते २१.९७ टक्के हरित क्षेत्र उरणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र वाढल्यानंतर सीमेंटचे जंगल तर वाढेल शिवाय त्याचे दुष्परिणाम म्हणून तपमानवाढीसह अनेक परिणामांना सामोरे जावे लाढणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग