शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

नाशिकमध्ये हरित क्षेत्र उरणार अवघे २० टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:13 IST

वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हरित क्षेत्र अवघे २० टक्के राहणार आहे. त्यामुळे निसर्ग तर उद्ध्वस्त होईलच शिवाय नाशिककरांना तपमानवाढीसारख्या अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हरित क्षेत्र अवघे २० टक्के राहणार आहे. त्यामुळे निसर्ग तर उद्ध्वस्त होईलच शिवाय नाशिककरांना तपमानवाढीसारख्या अनेक भीषण परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.  कोणे एकेकाळी नाशिक हे दंडाकारण्य म्हणून परिचित होते. निसर्गसंपदा हे नाशिकचे वैशिष्ट्य होते. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही शहराचा लौकिक होता. नाशिकमध्ये स्थायिक होण्यासाठी त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीचा आकर्षण बिंदूदेखील नाशिकचे हवापाणी हाच होता. परंतु आता हे सर्व बदलू लागले आहे. एप्रिल महिन्यातच पारा चाळिशीच्या पार गेला आणि आता तर वाढत्या रहिवास क्षेत्रामुळे वातावरणातील बदलासह अन्य अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.  नाशिक महापालिकेचे क्षेत्रफळ २५९.१२ चौरस किलोमीटर आहे. म्हणजेच २६ हजार ७४७ हेक्टर इतके आहे. नाशिक महापालिकेचा पहिला विकास आराखडा १९९२ ते ९५ दरम्यान मंजूर झाला. त्यावेळी ५ हजार ८७५ हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी करण्यात आले होते. म्हणजे त्यावेळची वने, औद्योगिक आणि आर्टिलरीसारखे क्षेत्र वगळून या विकसित होऊ शकणाऱ्या क्षेत्राचा विचार केला तर ते ५२.४८ टक्के इतके होते. परंतु आता दुसरा विकास आराखडा करण्यात आला, तोपर्यंत हे रहिवास क्षेत्र पूर्णत: विकसित होऊ शकले नाही व अवघे ४१.१ टक्के इतकेच क्षेत्र विकसित होऊ शकले आहे. असे असताना नव्या आराखड्यात भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून मोठ्या प्रमाणात रहिवास क्षेत्र विकसित करण्यात आले आहे.  नव्या आराखड्यात १५ हजार ४४ हेक्टर क्षेत्र रहिवासी क्षेत्र दर्शविण्यात आले असून, त्याची एकूण क्षेत्रफळाशी तुलना केली तर ती ७८. ७९ टक्के इतकी आहे. तर उर्वरित क्षेत्र ज्यात नदी, नाले, वने आणि क्षेत्राचा विचार केला तर ते २१.९७ टक्के हरित क्षेत्र उरणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र वाढल्यानंतर सीमेंटचे जंगल तर वाढेल शिवाय त्याचे दुष्परिणाम म्हणून तपमानवाढीसह अनेक परिणामांना सामोरे जावे लाढणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग